Home शासकीय कोल्हापूर महानगरपालिकेच्या आकृतीबंधास सरकारची मान्यता : श्री.राजेश क्षीरसागर यांची माहिती

कोल्हापूर महानगरपालिकेच्या आकृतीबंधास सरकारची मान्यता : श्री.राजेश क्षीरसागर यांची माहिती

0 second read
0
0
503

no images were found

कोल्हापूर महानगरपालिकेच्या आकृतीबंधास सरकारची मान्यता : श्री.राजेश क्षीरसागर यांची माहिती
मुंबई : कोल्हापूर ही “ड वर्ग महानगरपालिका असून, सदर महानगरपालिकेची स्थापना दि.१५/१२/१९७२ रोजी करण्यात आली आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार कोल्हापूर महानगरपालिकेची लोकसंख्या ५ लाखापेक्षा अधिक असून एकूण क्षेत्रफल ६६.८२ चौ.कि.मी. आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या क्षेत्राच्या नागरीकरणात मोठ्या प्रमाणात झालेली वाढ, वाढती लोकसंख्या परिणामी पायाभूत सुविधांवर पडणारा ताण, राज्य व केंद्र शासनाकडून शुरु असलेले विविध महत्वाचे प्रकल्प/उपक्रम, महानगरपालिका प्रशासनाकडून विविध लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी यामुळे कार्यरत कर्मचारी वर्ग कमी पडत असल्याने गतिगान प्रशासकीय कामकाज करण्यासाठी महानगरपालिकेस प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता भासत होती. त्यामुळे महानगरपालिकेत प्रशासकीय व तांत्रिक कामकाजासाठी नवीन पदांची निर्मिती करणे आवश्यक होते. महानगरपालिकेच्या आस्थापनेवर पदनिर्मितीसह आकृतीबंधास तयार करून सदर प्रस्ताव शासन स्तरावर सादर करण्याबाबतच्या सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी महानगरपालिका प्रशासनास दिल्या होत्या. त्यानुसार सदर आकृतीबंधास मान्यता देण्याबाबत प्रस्ताव शासनास सादर केला आहे. त्यास अनुसरुन कोल्हापुर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर नव्याने आवश्यक पदनिर्मिती करण्यासह महानगरपालिकेच्या एकत्रित आकृतीबंधास मान्यता देण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने शासन निर्णयाद्वारे मंजूर केला असून, यामुळे कोल्हापूर महानगरपालिका प्रशासकीय कामकाजाला गती मिळणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.
याबाबत श्री.राजेश क्षीरसागर म्हणाले, महानगरपालिका प्रशासनाचा आकृतीबंध गेल्या पंचवीस वर्षांपासून एकच आहे. गेल्या वर्षी त्यातील काही पदे कालबाह्य झाल्याने तसेच काही नवीन पदे निर्माण करण्याची गरज निर्माण झाल्याने नवीन आकृतीबंध तयार करून शासनास सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. याबाबत मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. या पाठपुराव्यास यश आले असून यामध्ये शासन मंजूर ४११० आणि नवनिर्मित ३३५ अशी एकूण ४४४५ पदसंख्येच्या आकृतिबंधाला शासनाने मंजुरी दिली आहे. यामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या ४४ विभागातील पदे भरण्यात येणार आहेत.
या रिक्त पदामुळे कोल्हापूर महानगरपालिका प्रशासकीय कामकाजावर विपरीत परिणाम होत होता. आरोग्यासह प्रत्येक विभागात अतिरिक्त कामकाजामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याचे दिसत होते. परंतु, मंजूर झालेल्या आकृतिबंधामुळे कोल्हापूर महानगरपालिकेचे प्रशासकीय कामकाज सुरळीत झालेले पहायला मिळेल. यामुळे कोल्हापूर महानगरपालिका प्रशासकीय कामकाजाला गती मिळणार आहे. त्यामुळे कोल्हापूर शहराच्या विकासाला गती मिळणार आहे. कोल्हापूरच्या विकासाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेल्या या निर्णयाबद्दल त्यांचे जाहीर आभार मानत असल्याचेही श्री.राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

४७ किलोमीटरच्या मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाच्या सर्व्हेक्षणाला केंद्र सरकारची मान्यता, 

  ४७ किलोमीटरच्या मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाच्या सर्व्हेक्षणाला केंद…