Home राजकीय सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यामध्ये चढ-उतार असतात- शरद पवार

सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यामध्ये चढ-उतार असतात- शरद पवार

2 second read
0
0
42

no images were found

सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यामध्ये चढ-उतार असतात- शरद पवार

बारामती: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार बारामतीतील गोविंद बाग या त्यांच्या निवासस्थानी आहेत. यावेळी त्यांनी दिवाळीनिमित्त महाराष्ट्रातील जनतेला दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. पवार यांनी शुभेच्छा देताना म्हटले की, सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यामध्ये चढ-उतार असतात. वेळप्रसंगी त्यांना संकटांनाही तोंड द्यावे लागते. मात्र आयुष्यातील काही दिवस असे असतात की, या सर्व संकटांना विस्मरण करून आनंदाने कुटुंबाच्यासमवेत दिवस घालवावं जगावे, अशी इच्छा असते. अशी इच्छा व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे दीपावली… महाराष्ट्रासह संबंध देशात लोक आनंदाने दिवाळी साजरी करत आहेत. महाराष्ट्रातील जनतेला हा दिवाळीचा सण त्यांच्या व्यक्तिगत आणि कौटुंबिक जीवनात समृद्धी येऊ व पुढील इच्छा आकांक्षांना यश मिळो, अशा शुभकामना दिवाळीनिमित्त शरद पवारांनी व्यक्त केल्या.
कालच शरद पवार यांनी पुण्यातील बाणेर येथे बंधू प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी पवार कुटुंबीयांच्या झालेल्या ‘गेटटुगेदर’ला हजेरी लावली होती. याठिकाणी अजित पवारही उपस्थित होते. या कौटुंबिक सोहळ्यानंतर अजित पवार तातडीने दिल्लीला अमित शाह यांच्या भेटीसाठी रवाना झाल्याची चर्चा आहे. या सगळ्या घटनाक्रमामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. काका-पुतण्याच्या भेटीमुळे यंदाच्या दिवाळीत महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप घडणार का, याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.
तर दुसरीकडे दिल्ली येथे केंद्रीय निवडणूक आयोगापुढे राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि चिन्ह मिळविण्यावरून शरद पवार गट आणि अजित पवार गटात संघर्ष सुरू आहे. कालच्या सुनावणीसाठी स्वत: शरद पवार निवडणूक आयोगाच्या कार्यालयात उपस्थित होते. यावेळी शरद पवार गटाच्या बाजूने युक्तिवाद करण्यात आला. शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी अजितदादांच्या गटाकडून सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रांबद्दल आक्षेप घेतला. आम्ही यापैकी २० हजार शपथपत्रांची तपासणी केली. त्यामध्ये ८ हजारापेक्षा जास्त प्रतिज्ञापत्रे बोगस असल्याचा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आला. यावर आता अजित पवार गट कशाप्रकारे बाजू मांडणार, हे पाहावे लागेल.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

४७ किलोमीटरच्या मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाच्या सर्व्हेक्षणाला केंद्र सरकारची मान्यता, 

  ४७ किलोमीटरच्या मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाच्या सर्व्हेक्षणाला केंद…