
no images were found
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी शेतकऱ्यांशी साधणाऱ्या सुसंवादाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा लाभ : विजय जाधव
कोल्हापूर : “प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रच्या” माध्यमातून शेतक-यांना शेतीसाठी लागणारी बी-बियाणे, औषधे, औजारे, खते यांच्या खरेदीसाठी वेगवेगळ्या दुकानात जावे लागते. पंतप्रधान किसान सुविधा केंद्र ही योजना शेतक-यांना या सर्व सेवा सुविधा एकाच ठिकाणाहून पुरविण्यासाठी सुरू करण्यात येत आहे. एकाच ठिकाणी बी-बियाणे, औषधे, औजारे, खते उपलब्ध झाल्यामुळे त्यांची धावपळ वाचणार आहे. सध्या तालुका, प्रांत, ब्लॉक, खेडेगांव पातळीवर खतांची किरकोळ विक्री करणारी (रिटेल शॉप) केंद्रे आहेत. त्याचे रूपांतर आता वन स्टॉप शॉप मध्ये होणार आहे. सद्या देशभरातील एक लाखाहून अधिक खत विक्री केंद्राचे रूपांतर पंतप्रधान किसान
समृद्धी केंद्रामध्ये करण्यात आलेले आहे. उर्वरित 1.8 लाख खत विक्री दुकानांचे रूपाांतर या वर्षाच्या अखेरीस किसान समृद्धी केंद्रामध्ये करण्यात येईल.
या योजनेचे उदघाटन २७ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते होणार असून या प्रसंगी ८.५ करोड पीएम किसान लाभार्थी यांना १४ व्या हप्त्याचे हस्तांतरण होणार असून यावेळी ते शेतकऱ्यांशी सुसंवाद सुद्धा साधणार आहे. २७ जुलैला सकाळी ११ वाजता ते सवांद साधणार आहे. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी http://pmevents.ncog.in या संकेतस्थळावर नोंदणी करावयाची आहे किंवा https://pmindiawebcast.nic.in या लिंक वर जावून ऑनलाईन कार्यक्रम बघता येणार आहे. तसेच सदरील कार्यक्रम जवळील कृषी केंद्रावर लावलेल्या टीव्हीवर सुद्धा शेतकरी बघू शकणार आहे. शेतकऱ्यांना लाभदायक अशा प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राच्या या कार्यक्रमास जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी केले आहे.