Home मनोरंजन  तंदुरुस्तीसाठी  मोहित मल्होत्रा करतो समतोल व्यायाम

 तंदुरुस्तीसाठी  मोहित मल्होत्रा करतो समतोल व्यायाम

8 second read
0
0
40

no images were found

 तंदुरुस्तीसाठी  मोहित मल्होत्रा करतो समतोल व्यायाम

प्रसारणास प्रारंभ झाल्यापासूनच ‘झी टीव्ही’वरील ‘भाग्यलक्ष्मी’ ही मालिका नेहमीच चांगल्या कारणांसाठी चर्चेत राहिली आहे. मालिकेतील ऐश्वर्या खरे आणि रोहित सुचांती या प्रमुख कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले असून #RishMi  ही नावे आता घरोघरी पोहोचली आहेत. अलीकडच्या भागांमध्ये पाहिले की लक्ष्मीने (ऐश्वर्या खरे) शहराची भीषण बॉम्बस्फोटापासून कशी सुटका केली आणि नंतर ती कड्यावरून पडल्यावर रिषीने (रोहित सुचांती) तिची कशी सुटका केली ते. पण त्यांच्या जीवनात अशा नाट्यमय घटना घडत असतानाच ओबेरॉय परिवाराने लक्ष्मी आणि विक्रम (मोहित मल्होत्रा) यांच्या साखरपुड्याची (रोका) तयारी सुरू केली आहे.

प्रेक्षकांना उत्कृष्ट करमणूक देण्यासाठी हे कलाकार अथकपणे काम करत असून चित्रीकरणाच्या प्रदीर्घ वेळापत्रकामुळे त्यांना स्वत:साठी मोकळा वेळ काढणे अशक्य बनत आहे. अर्थात तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यास प्रत्येकाने प्राथमिकता दिली पाहिजे. यासाठीच मोहित मल्होत्राने आपल्या या व्यग्र वेळापत्रकातून एक शक्कल काढली आहे. त्याने आपल्या आहारावर नियंत्रण तर आणले आहेच, पण तो नियमितपणे व्यायामशाळेतही जातो. त्यासाठी त्याने आता सायकल चालविण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे त्याच्या व्यायामाचा समतोल राखला जातो. तो दर रविवारी सायकल फिरविण्यसाठी मुद्दाम वेळ काढतो- मग तो चित्रीकरण करीत असो की नसो. आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी सायकल चालविणे ही अगदी योग्य गोष्ट आहे, असे त्याचे मत आहे.

मोहित मल्होत्रा म्हणाला, “एक अभिनेता म्हणून मी नेहमीच स्वत:ला तंदुरुस्त राखण्याचा प्रयत्न करत असतो. माझ्या कामाची मागणी आहे म्हणून नव्हे, तर माझ्या एकंदर शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी मी तंदुरुस्त राहतो. यात सायकल चालविण्यासारख्या व्यायामामुळे मला खूप लाभ होत असल्याचं माझ्या लक्षात आलं आहे. सायकलबद्दल सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे त्यामुळे तुम्ही शारीरिकदृष्ट्या तर तंदुरुस्त राहताच, पण सायकल चालवताना माझं मन शांत होतं आणि मनावरचा ताण दूर होतो. तुम्ही आपले कुटुंबीय किंवा मित्रांबरोबर सायकल चालवू शकता. तुम्ही तुमच्या गृहसंकुलाच्या कॉम्प्लेक्समध्येही सायकल चालवू शकता किंवा तुमच्या शहरात होणार्‍्या सायकल मॅरेथॉनमध्येही तुम्ही भाग घेऊ शकता. मला असं वाटतं की ज्यांची कार्यालयं घराजवळ आहेत, त्यांनी सायकलवरून कार्यालयात जावं. कारण सायकलने प्रवास करणं हा पर्यावरणप्रेमी उपक्रम असून तो तंदुरुस्त राहण्याचाही उत्तम मार्ग आहे.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…