
no images were found
हिंदू जागृत होण्याच्या भीतीने ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाला विरोध – अधिवक्त्या मणी मित्तल
‘लव्ह जिहाद’ या संवेदनशील विषयावर ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट बनवणारे निर्माते आणि दिग्दर्शक यांचे अभिनंदन केले पाहिजे. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू सरकारने ‘द केरला स्टोरी’वर बंदी घातली. साम्यवादी आणि मुसलमानांचे तुष्टीकरण करणार्या या राज्य सरकारांना न्यायालयाने याविषयी फटकारल्यावरही हिंदूंच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला यांनी ठेच पोचवली. या राज्यात चित्रपटावर बंदी जरी घातली असली, तर आता भारतातच नव्हे विदेशातसुद्धा अनेक देशांत हा चित्रपट प्रदर्शित झाला असून लोकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. ‘लव्ह जिहाद’ घडवून आणणार्या लोकांचे पितळ आता उघड झाले असून ‘द केरला स्टोरी’सारखे चित्रपट पाहून हिंदू जागृत होतील, या भीतीमुळे ‘द केरला स्टोरी’ला विरोध होत आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाच्या अधिवक्त्या मणी मित्तल यांनी केले.
हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘द केरला स्टोरी : बंदी चित्रपटावर कि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर ?’ या विषयावरील ऑनलाईन ‘विशेष संवादा’त त्या बोलत होत्या. अधिवक्त्या मणी मित्तल* पुढे म्हणाल्या की, खरे तर ‘द केरला स्टोरी’मध्ये ‘लव्ह जिहाद’विषयी थोडेसे दाखवण्यात आले आहे. प्रत्यक्षात वस्तुस्थिती खूप भयानक आहे. हिंदूंच्या विरोधात अनेक ‘ओ माय गॉड’, ‘पीके’ असे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले, तसेच ‘आश्रम’सारख्या वेब सीरीजमधून हिंदु धर्म आणि ऋषिमुनी यांचा अपमान करण्यात आला. ‘द केरला स्टोरी’ला विरोध करणारे त्या वेळी गप्प होते. ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाला हिंदूंनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला पाहिजे.