
no images were found
मुख्यमंत्रीसाठी अजित पवारांसोबतच या नेत्याचंही नाव चर्चेत; अमोल कोल्हेंनी सांगितलं
सांगली : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू आहे. यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांचं नाव आघाडीवर आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे राज्यातील विविध ठिकाणी पोस्टर्स लागले आहेत. भावी मुख्यमंत्री म्हणून या पोस्टर्सवर उल्लेख करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांनी अजित पवार यांची पोस्टर्स लावली आहेत. अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. अजित पवार हे भाजपसोबत गेल्यास त्यांनाही मुख्यमंत्रीपद मिळू शकते असाही अंदाज बांधला जात आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. दुसरीकडे राज्यात मविआची सत्ता आल्यास मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीला मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे अजित पवार हे भाजपमध्ये प्रवेश करणार का असा सवाल उपस्थित होत आहे. राज्यात मविआची सत्ता आल्यास सध्या तरी अजित पवार हेच मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार आहेत. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं नाव देखील समोर आलं आहे. जयंत पाटील हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. अमोल कोल्हे यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्यासारख्या सुशिक्षित व सुसंस्कृत नेत्याची राज्याला मुख्यमंत्री म्हणून गरज आहे. ते आदर्श मुख्यमंत्री ठरतील, असं राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. ते सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना एका कार्यक्रमात बोलत होते.