
no images were found
महागाईवर यात्रा काढा. आणि सावरकरांना भारतरत्न द्या
कोल्हापूर : जनता महागाई बेरोजगारीने त्रस्त झालेली आहे… शेतकरी ,कामगार, व कष्टकरी असा कुठलाही घटक या सरकारवर समाधानी नाही.. फक्त अदानी आणी अंबानी सोडले तर सर्व जनता मोठ्या प्रमाणावर असंतोषाला तोंड देत आहे.. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, यांच्यासारख्या राष्ट्रपुरुषांचे अपमान सातत्यान भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांच्याकडून सातत्याने होत आहेत .. महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मुंबईमध्ये मराठी मनाचा अपमान राज्यपालांच्या कडून केला गेला… पण या विषयी कुठल्याही गोष्टीच्या विषयी ब्र सुद्धा न काढणाऱ्या भाजपला मात्र या सगळ्या गोष्टींच्या वर धार्मिकतेची तेढ आता वाढवण्याशिवाय पर्याय राहीलेला नाही. ही गोष्ट लक्षात घेता हिंदूजन आक्रोश मोर्चा काढावे लागले हिंदूंच्या या देशात हिंदू महाआक्रोश करावा लागतो यासारखं दुर्दैवी परिस्थिती कोणतीही नाही. परंतु निवडणूकीतून सत्ता आणि पैसा आणि पैसातून सत्ता या एकाच समीकरणात गुंतलेल्या भाजपला निवडणुकीच्या तोंडावर आता आपली विकासाच्या भुलभुलैय्यावर निवडणुकीत आपली आता घसरण होते हे लक्षात येता पुन्हा एकदा हिंदुत्व आणि राममंदिर या नेहमीच्या खेळीन लोकांच्या भावनेशी खेळ करण्याचा प्रयत्न केलेला आहे…
आजही ज्या स्वातंत्र्य विरांना हा महाराष्ट्र नव्हे तर भारतामधील सर्व जनता शिरोधार्थ मानते. ज्यांनी जाज्वल देशाभिमान असणारी एक पिढी घडवली. आणि आजही सावरकरांच्याच पावलावर वाटचाल करत समस्त हिंदू समाज राहत असताना निव्वळ आपल्याला येणाऱ्या अपयशाला सावरण्याकरता स्वातंत्र्यवीर सावरकरांची यात्रा काढणाऱ्या भाजपची नौटंकी लोकांनी ओळखली असून निव्वळ स्वतःचा स्वार्थ आणि निवडणुका हे एकच सूत्र डोळ्यासमोर ठेवून स्वतःचा स्वार्थ साधण्याकरता केलेल्या यात्रा थांबून लोकांची ससेहोलपट होणाऱ्या महागाई व ईतर मूलभूत प्रश्नांच्या सोडवणुकी करत यात्रा काढाव्यात आणि या महान स्वातंत्र्यविराला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे असे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवसेनेच्या वतीने सावरकरांना भारतरत्न द्या या मागणीसाठी केलेल्या धरणे आंदोलनाच्या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी यावेळी काढले.