
no images were found
साखरेच्या उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर,
सध्या देशात साखरेच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. केंद्र सरकारने साखर उत्पादनाबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखरेचं उत्पादन 6 लाख टनांनी वाढलं आहे. यंदा साखरेचं उत्पादन 187 लाख टनांवरुन 193 लाख टन झालं आहे. यामुळे आगामी काळात साखरेच्या दरात घसरण नोंदवली जाऊ शकते. याचा देशातील मोठ्या लोकसंख्येला आर्थिक फायदा होईल. इंडियन शुगर मिल असोसिएशनच्या मते, गेल्या 4 महिन्यांत साखरेचे उत्पादन 3.42 टक्क्यांनी वाढले. गेल्या वर्षी ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीत साखरेचे उत्पादन 187.1 लाख टन होते. यंदा त्यामध्ये 6 लाख टनांची वाढ झाली आहे.
. साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश, तिसऱ्या क्रमांकावर कर्नाटक आहे.गेल्या वर्षीच्या साखर गळीत हंगामात 510 साखर कारखान्यांनी ऊसाचं गाळप केलं होतं. मात्र, यावर्षी 31 जानेवारीपर्यंत 520 साखर कारखान्यांचे गाळप सुरु आहे. इथेनॉल निर्मितीसाठी पाठवलेला मोलॅसेस एकूण साखर उत्पादनापेक्षा वेगळा असतो. गेल्या वर्षी ते 187.1 लाख टन होते. मात्र, भारत सरकार इथेनॉल निर्मितीवर अधिक भर देत असल्याचा कयास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.