Home सामाजिक महिन्याअखेरीस बँका ४ दिवस बँक राहणार बंद?

महिन्याअखेरीस बँका ४ दिवस बँक राहणार बंद?

0 second read
0
0
232

no images were found

महिन्याअखेरीस बँका ४ दिवस बँक राहणार बंद?

मुंबई: या महिन्याअखेरीस बँका ४ दिवस बंद असणार आहेत. त्यामुळे तुमची कामं अडू शकतात. यावेळी एटीएममध्ये देखील प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही आधीच पैसे काढून ठेवण्याची तरतूद करा. कारण महिन्याच्या अखेरीस बँक कर्मचाऱ्यांनी बँक संपाची घोषणा केली आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (यूएफबीयू) या बँक संघटनांच्या संघटनेने संपाची हाक दिली आहे. गुरुवारी मुंबईत झालेल्या यूएफबीयूच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
३०आणि ३१ जानेवारीला संप झाला तर सलग चार दिवस बँका बंद राहतील. कारण २८ जानेवारीला चौथा शनिवार असून २९ ला रविवार असल्याने साप्ताहिक सुट्टी आहे. १ फेब्रुवारीला बँका उघडतील. ४ दिवस बँक बंद असल्याने ग्राहकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागू शकते. एटीएममध्ये कॅश संपणे, चेक क्लीअर न होणं अशा काही समस्या उद्भवण्याची शक्यता आहेत. या कालावधीमध्ये इंटरनेट बँकिंग सुरू असेल. त्यामुळे तुमची छोटी कामं त्यावरून होऊ शकतात. बँक कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या काही मागण्या मान्य करण्याचे आवाहन करत आहेत. सरकारवर दबाव आणण्यासाठी कर्मचारी आता ३० जानेवारीपासून दोन दिवसांच्या संपावर जात आहेत. ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशनच्या (एआयबीईए) एका पदाधिकाऱ्याने सांगितले.
एआयबीईएने आपल्या मागण्या इंडियन बँक्स असोसिएशनला (आयबीए) पत्राद्वारे पाठविल्या आहेत. बँक असोसिएशनकडून यावर कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. आता आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी कर्मचाऱ्यांकडे संपाचा मार्ग आहे. एआयबीईएचे सरचिटणीस सी. एच. वेंकटचलम म्हणाले की, बँक कर्मचाऱ्यांच्या पाच मागण्या आहेत.५ डे विक करावा, अशी बँक संघटनांची मागणी आहे. त्याचबरोबर पेन्शनही अद्ययावत करण्यात यावी. एनपीएस रद्द करावा, वेतनवाढीसाठीही चर्चा व्हायला हवी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…