
no images were found
‘रॅपिडो’ला मुंबई उच्च न्यायालयाचे बाईक, टॅक्सीसह सर्व सेवा बंद करण्याचे निर्देश
मुंबई : रॅपिडो या मोबाईल आधारित टॅक्सी- बाईक सेवा देणाऱ्या कंपनीला मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे.आज दुपारपासून राज्यातील रॅपिडोची सर्व सेवा २० जानेवारीपर्यंत बंद करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी रॅपिडोकडे आवश्यक परवाना नसल्याची बाब निदर्शनास आणून दिल्यावर न्यायालयाने हे निर्देश दिले. दरम्यान, याप्रकरणी २० जानेवारी रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे.
रॅपिडोने गेल्यावर्षी पुणे आरटीओमध्ये ॲग्रीगेटर लायसन्ससाठी केलेला अर्ज परिवहन विभागाकडून नाकारण्यात आला होता. याविरोधात रॅपिडोने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणावर आज न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी ही सेवा बेकायदेशीर असून अशा प्रकारची सेवा देण्याचे धोरण राज्यात नाही, असे परिवहन विभागाकडून न्यायालयात सांगण्यात आले. तसेच राज्य सरकारने ‘बाइक टॅक्सी’बाबत स्वतंत्र समिती स्थापन केल्याचे ही उच्च न्यायालयाच्या निदर्शनात आणून दिली. त्यानंतर न्यायालयाने आज दुपारी १ वाजेपासून राज्यातील रॅपिडोची सेवा २० जानेवारीपर्यंत बंद करावी, असे निर्देश दिले आहेत.
अंबरनाथ परिसरातील प्रिंटिंग प्रेसच्या कंपनीत काम करणारे कामगार आणि त्यांचे नातेवाईक हे शिर्डी येथे साई बाबांच्या दर्शनाला जात होते. एकूण पंधरा गाड्या या अंबरनाथ परिसरातून शिर्डी येथे रवाना झाल्या होत्या. दरम्यान, त्यातील एका बसचा पाथरे गावाजवळ सकाळी सातच्या दरम्यान अपघात झाला. शिर्डीला पोहोचण्यासाठी अर्धा तासांचा अंतर राहिलं असतानाच या अपघात झाला. या अपघातात दोन चिमुकल्यांसह सहा महिला आणि दोन पुरुष यांचा समावेश होता.