आमदार राजेश क्षीरसागर यांचा आवाज विधिमंडळात घुमणार; अधिवेशनात कामकाजाच्या पहिल्याच दिवशी आमदार क्षीरसागर यांचे तब्बल ६ तारांकित प्रश्न मुंबई : राज्याच्या पावसाळी अधिवेशनास आज सुरवात झाली असून, विधीमंडळाच्या प्रश्नोतराच्या कामकाजास उद्या दि.२३ पासून सुरवात होणार आहे. पावसाळी अधिवेशन कामकाजाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे राज्यातील विविध ज्वलंत प्रश्नांवरून विधिमंडळात आवाज उठवणार आहेत. …