“खासदार संजय राऊत हिम्मत असेल तर बेळगावामध्ये या” कन्नडिगांनीचे आव्हान बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावर लवकर तोडगा निघाला नाही तर, माझ्यासह आमच्या नेत्यांना बेळगावला जावं लागेल असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला होता. त्यानंतर ४८ तासानंतरही हा वाद विकोपाला जात असून आता कर्नाटकातील कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रासह ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनाच थेट इशारा दिला आहे. …