पश्चिम महाराष्ट्र व कोकण विभागासाठी अत्याधुनिक अन्न, औषध व कृषी उत्पादन चाचणी प्रयोगशाळा स्थापन करावी : आमदार राजेश क्षीरसागर यांची मंत्री ना.नरहरी झिरवाळ यांच्याकडे मागणी मुंबई : कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये कृषी प्रक्रिया, दुग्ध व्यवसाय, अन्नप्रक्रिया, औषधनिर्मिती, जैवतंत्रज्ञान तसेच निर्याताभिमुख उद्योग मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. मात्र, या उद्योगांना उत्पादनांची गुणवत्ता, रासायनिक, सूक्ष्मजैविक, अवशेष (Residue), सुरक्षा …