Home Video पदवीधर मित्र माणिक पाटील- चूयेकर यांचे बेमुदत अन्न त्याग आंदोलन.

पदवीधर मित्र माणिक पाटील- चूयेकर यांचे बेमुदत अन्न त्याग आंदोलन.

55 second read
0
0
11

no images were found

पदवीधर मित्र माणिक पाटील- चूयेकर यांचे बेमुदत अन्न त्याग आंदोलन.                                                                   कोल्हापूर (प्रतिनिधी): ऊस शेती व साखर कारखानदारी भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने सर्वात मोठा कृषी  उद्योग आहे. काही खाजगी साखर कारखाने वगळता बहुसंख्य साखर कारखाने सहकारी तत्त्वावर असल्यामुळे ते शेतकरी सभासदांच्या म्हणजेच बळीराजांच्या मालकीची आहे .ऊस उत्पादन खर्चात झालेली भरमसाठ वाढ परंतु शेतकऱ्यांना त्या प्रमाणात मिळणारा कमीचा एफआरपी ,साखर कारखानदारांना एमएसपी करिता सध्या मिळणारा अपुरा दर को जनरेशन द्वारे शासनाला पुरवठा होणाऱ्या विजेच्या दरात झालेली कपात उसापासून साखरे व्यतिरिक्त तयार होणाऱ्या इथेनॉल मोलसिस स्पिरीट इत्यादी उप पदार्थांसाठी साखर कारखानदारांना मिळणारा कमी भाव यामुळे बळीराजा बरोबरच त्याच्या मालकीची असणारी साखर कारखानदारी सध्या अतिशय अडचणीत आली आहे. येणाऱ्या ऊस हंगामात देशाबरोबरच महाराष्ट्रातील अनेक साखर कारखाने सुरू होतील की नाही अशी शंका व्यक्त केली जाऊ लागली आहे .परिस्थिती अशीच राहिल्यास शेतकऱ्यांबरोबरच तमाम साखर कारखानदारीला मोठा  धक्का निर्माण होऊ शकतो.                                                   बळीराजाच्या संपन्नते बरोबरच साखर कारखानदारीला ऊर्जित अवस्था येण्यासाठी व भारतीय अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे आमच्या काही महत्त्वाच्या व्यवहारिक मागण्या आहेत. शासनाने जाहीर केलेल्या चालू वर्षीच्या प्रतीटनास 3650 ऐवजी 4500रुपये द्यावेत.सध्याच्या साखर एमएसपी मध्ये प्रति किलो रुपये वीस ची वाढ करावी ,शासनाने एमएसपी मध्ये रुपये वीस ची वाढ केल्यास त्याचा फटका गरिबांना बसू नये म्हणून दारिद्र्यरेषेखालील घटकांना प्रति व्यक्ती प्रतिमा रेशन कार्ड व रुपये वी ची सवलत साखर खरेदीवर देणे अथवा रुपये वीसची शासकीय अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा करावी,देशांमध्ये अपवादात्मक येणारी साखर टंचाईची परिस्थिती वगळता निर्यात बंदी कायमची रद्द करावी, साखर निर्यात करताना शासनाने साखरेंना प्रत क्विंटल 1000 ते 3000 रुपये अनुदान द्यावीत, उसापासून साखरे व्यतिरिक्त तयार होणाऱ्या इतर उपपदार्थांच्या दरात ही साखरेच्या वाढीव दराच्या प्रमाणात वाढ मिळवून द्यावी ,को जनरेशन पासून तयार होणाऱ्या पूर्वीच्या वीज दरात शासनाने केलेली कपात रद्द करून तो दर पूर्वी इतकाच म्हणजे सहा रुपये 75 पैसे प्रति युनिट द्यावा ,इंधनातील इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण 100% पर्यंत वाढवावे . अशी माहिती यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.                                          यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेला भाजपच्या किसान मोर्चा ची भगवान काटे, रेशन महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर रवींद्र मोरे , आझाद हिंद क्रांती संघटनेची मुकुंद पाटील, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील ,जय शिवराय किसान संघटनेचे सदाशिव कुलकर्णी ,यशवंत क्रांती संघटनेचे संजय वाघमोडे ,शरद जोशी संघटनेचे ज्ञानदेव पाटील ,रघुनाथ दादा शेतकरी संघटनेचे बाळ नाईक, व अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Video
Comments are closed.

Check Also

शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा वारसा जपणार : आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह शिवसैनिकांचा निर्धार

शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा वारसा जपणार : आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह शिवसैनिकांचा न…