Home Video डीकेटीईच्या ६ विद्यार्थ्यांची क्लिंजनबर्ग कंपनीत वार्षिक सहा लाख पॅकेजवरती निवड

डीकेटीईच्या ६ विद्यार्थ्यांची क्लिंजनबर्ग कंपनीत वार्षिक सहा लाख पॅकेजवरती निवड

7 second read
0
0
7

no images were found

डीकेटीईच्या ६ विद्यार्थ्यांची क्लिंजनबर्ग कंपनीत वार्षिक सहा लाख पॅकेजवरती निवड
इचलकरंजी (प्रतिनिधी):. येथील डीकेटीईच्या सहा विद्यार्थ्यांची जागतिक स्तरावरील प्रतिष्ठीत क्लिंजनबर्ग कंपनीत कॅम्पस प्लेसमेंटद्वारे निवड झाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक सहा लाख रुपयांचे आकर्षक वेतन पॅकेज प्राप्त झाले आहे.
जर्मनीस्थित क्लिंजनबर्ग ही गिअर तंत्रज्ञान, ड्राईव्ह सिस्टीम्स, औद्योगिक ऑटोमेशन आणि उच्च परिशुध्दता मापन तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य बहुराष्ट्रीय कंपनी आहे. अत्याधुनिक उत्पादन तंत्रज्ञान आणि नवोन्मेषी अभियांत्रिकी उपयांसाठी कंपनी जागतिक स्तरावर ओळखली जाते. विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानावर काम करण्याची संधी उपलब्ध करुन देणारी क्लिंजनबर्ग ही कंपनी अभियांत्रिकी क्षेत्रात प्रतिष्ठेची मानली जाते.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये एआयडीस विभागातून शाहुराजे पाटील, एआयएमल विभागातून ओंकार बरद, सोनाली पाटील, कॉम्प्युटर विभागातुन कोमल यंगल, साहिल मकानदार व मेकॅनिकलमधून विश्‍वराज पाटील यांचा समावेश आहे. डीकेटीई ही संस्था विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान, कौशल्य विकास आणि गुणवत्तापुर्ण प्लेसमेंट देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशिल आहे यामुळे नामांकित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये करिअर घडविण्याची उत्तम संधी उपलब्ध होत आहेत.
या यशाबददल डीकेटीईचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व ट्रस्टींनी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना संस्थेच्या संचालिका प्रा. डॉ.सौ.एल.एस. आडमुठे, विभागप्रमुख डॉ.एस.के.शिरगावे, डॉ व्ही.आर.नाईक, डॉ डी.व्ही.कोदवडे, डॉ टी.आय.बागबान, टीपीओ जी.एस.जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Video
Comments are closed.

Check Also

कर्जमाफी योजनेवरील विरोधकांची टीका दिशाभूल करणारी-हेमंत पाटील  पात्र शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्यावर सरकारचा भर पुणे,: महाराष्ट्र सरकारच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’वर विरोधकांकडून सातत्याने केली जाणारी टीका राजकीय हेतूने प्रेरित आहे, असा दावा भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केला आहे. शेतकरी हितार्थ सरकारने उचललेल्या भूमिकेचे त्यांनी स्वागत केले आहे. मंत्रिमंडळ टिपणाचा हवाला देत कर्जमाफी योजनेतील पात्रतेच्या अटींमुळे राज्यावरील आर्थिक भार कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, या अटींचा उद्देश शेतकऱ्यांना वंचित ठेवणे नसून, प्रत्यक्ष गरजू आणि पात्र शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवणे हा आहे; असे प्रतिपादन पाटील यांनी केले. राज्य सरकारने अत्यंत जबाबदारीने ही योजना तयार केली आहे. सार्वजनिक निधीचा योग्य वापर व्हावा आणि कर्जमाफीचा लाभ खऱ्या अर्थाने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनाच मिळावा, यासाठी काही निकष ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे योजनेची परिणामकारकता वाढणार असून, निधीचा अपव्यय टाळण्यास मदत होईल, असे पाटील म्हणाले. विरोधकांनी योजनेतील अटींचा आधार घेत सरकारवर टीका करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या हितासाठी विधायक सूचना द्याव्यात, असे आवाहनही त्यांनी केले. राज्य सरकारने कर्जमाफीबरोबरच सिंचन, पीकविमा, कृषी पायाभूत सुविधा आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. शेतकरी कल्याण आणि कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी सरकार कटिबद्ध असून, या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना होणार असल्याचा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

कर्जमाफी योजनेवरील विरोधकांची टीका दिशाभूल करणारी-हेमंत पाटील  पात्र शेतकऱ्यांपर्यंत …