no images were found
महाराष्ट्र दिन साजरा करताना राज्यात मिळालेल्या आपुलकीचा आणि घरगुती ऊबदारपणाचा अनुभव व्यक्त केला कलाकारांनी
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सोनी सब चे कलाकार – नितीन बाबू, रजत वर्मा, मुस्कान बामने, इक़बाल खान आणि सचिन कावेथम यांनी या राज्याशी असलेल्या आपुलकीच्या नात्याबद्दल मनापासून भावना व्यक्त केल्या. वेगवेगळ्या शहरांतून स्वप्नांच्या मागे मुंबईत आलेल्या अनेकांसाठी महाराष्ट्र हा संधी, स्वीकार आणि प्रगतीचा प्रदेश ठरला आहे. केवळ मनोरंजन उद्योगाचे केंद्र म्हणून नव्हे, तर आपल्या उबदारपणाने आणि समावेशकतेने या राज्याने त्यांना वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य घडवून दिले आहे. समृद्ध परंपरा, रंगीबेरंगी संस्कृती आणि जलद गतीचे पण आपुलकीने भरलेले जीवन यामुळे महाराष्ट्राने कलाकारांच्या मनावर कायमचा ठसा उमटवला आहे. या महाराष्ट्र दिनी कलाकारांनी लोक, खाद्यसंस्कृती, परंपरा आणि रोजच्या अनुभवांमधून महाराष्ट्राने त्यांना कसे घडवले याबद्दल सांगितले.
यादें मालिकेत डॉ. देव मेहता यांची भूमिका साकारणारे इक्बाल खान यांनी सांगितले, “महाराष्ट्र दिनी मला या राज्याने दिलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञता वाटते. जेव्हा मी मोठं होण्याचं स्वप्न घेऊन मुंबईत आलो, तेव्हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. पण वर्षानुवर्षे मुंबईने मला संधी, अनुभव आणि स्थैर्य दिलं. इथे इतकी वर्षं घालवल्यानंतर ही शहर माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनली आहे. इथेच मी माझं आयुष्य आणि कुटुंब उभारलं, आणि आज ही शहर खरंच माझं घर बनलं आहे.”
पुष्पा इम्पॉसिबल मालिकेत शनायाची भूमिका साकारणारी मुस्कान बामणे यांनी सांगितले, “महाराष्ट्र दिन नेहमीच खास वाटतो कारण हीच ती जागा आहे जिथे मी मोठी झाले. खूप लहान वयातच मी अभिनयासाठी मुंबईत आले आणि अनेक अर्थांनी इथेच मी वाढले. सुरुवातीला सगळं अनोळखी वाटत होतं, पण महाराष्ट्राने मला उघड्या मनाने स्वीकारलं. वर्षानुवर्षे मी इथली संस्कृती, सण अनुभवले आणि पारंपरिक मराठी लुक्सही केले, ज्यामुळे मला नेहमी या भूमीशी जोडलेपण जाणवतं. आज ही शहर फक्त कामाची जागा नाही, तर माझं आयुष्य सुरू झालेली जागा आहे.”
इत्ती सी खुशी मालिकेत विराटची भूमिका साकारणारे रजत वर्मा यांनी सांगितले, “महाराष्ट्र दिनी मला जाणवतं की हे राज्य माझ्या आयुष्याचा किती मोठा भाग बनलं आहे. दिल्लीहून आलो तेव्हा इथलं आयुष्य कसं असेल याबद्दल थोडी शंका होती, पण इथल्या लोकांच्या उबदारपणामुळे सगळं सहज झालं. हळूहळू मी इथल्या संस्कृतीवर प्रेम करू लागलो – गणेशोत्सवाची भक्ती अनुभवणं, वडापावसारख्या साध्या आनंदाचा आस्वाद घेणं. इथली ऊर्जा रोज तुम्हाला पुढे जाण्यास प्रवृत्त करते. स्थानिक अनुभवांपासून ते रोजच्या संवादांपर्यंत, या जागेने मला घडवण्यात खूप मोठी भूमिका बजावली आहे.”
पुष्पा इम्पॉसिबल मालिकेत चिरागची भूमिका साकारणारे नितीन बाबू यांनी सांगितले, “या महाराष्ट्र दिनी मला या राज्याने दिलेल्या प्रवासाबद्दल खूप आभार वाटतात. जम्मू-काश्मीरच्या छोट्या गावातून आलो तेव्हा मुंबई म्हणजे एकदम वेगळी दुनिया वाटली. सगळं नवीन होतं – गती, लोक, जीवनशैली. पण हळूहळू महाराष्ट्राने मला अपेक्षेपेक्षा जास्त आपलेपण दिलं. लोकांची उबदारता आणि इथली विविधता यांनी मला केवळ अभिनेता नव्हे तर माणूस म्हणूनही घडवलं. आज ही शहर माझं खरं घर आहे, जिथे मी माझी स्वप्नं जगतो आहे.”
इत्ती सी खुशी मालिकेत सिद्धूची भूमिका साकारणारे सचिन कावेथम यांनी सांगितले, “महाराष्ट्र दिनी मी या शहरात किती दूर आलो आहे याचा विचार करतो. जयपूरहून मुंबईत आलो तेव्हा ना ओळखी होत्या, ना काही ठोस दिशा होती. सगळं अगदी शून्यातून सुरू झाल्यासारखं वाटलं. प्रवास सोपा नव्हता, पण तो शिकण्याचा आणि स्वतःला शोधण्याचा टप्पा होता. या शहराने त्या प्रक्रियेत मोठी भूमिका बजावली – संस्कृती समजून घेणं, जीवनशैलीशी हळूहळू जुळवून घेणं. अजूनही मी माझा मार्ग शोधतो आहे, पण रोज इथलं आयुष्य मला माझ्या ध्येयाजवळ नेऊन ठेवतं.”