Home शासकीय जनगणना 27:क्षेत्रीय प्रशिक्षकांसाठी 6 ते 15 एप्रिल या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

जनगणना 27:क्षेत्रीय प्रशिक्षकांसाठी 6 ते 15 एप्रिल या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

1 second read
0
0
19

no images were found

जनगणना 27:क्षेत्रीय प्रशिक्षकांसाठी 6 ते 15 एप्रिल या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

कोल्हापूर  : जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत जनगणना २०२७ कामकाज सुरू झाले असून यामध्ये जिल्ह्यातील १२ तहसील कार्यालये व १३ नगरपालिका/नगरपंचायत कार्यक्षेत्राकरिता नियुक्त अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाला सोमवार दि 6 एप्रिलपासून निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव तथा कोल्हापूर जिल्हा जनगणना अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत नवीन सभागृहात प्रारंभ करण्यात आला .
यावेळी मार्गदर्शन करताना श्री गुरव म्हणाले, जनगणनेचे कामकाज हे देशाच्या नियोजन व व्यवस्थापन प्रक्रियेत अत्यंत महत्त्वपूर्ण आहे . जिल्ह्यातील सर्व नियुक्त अधिकारी – कर्मचाऱ्यांनी हे प्रशिक्षण गांभीर्याने घ्यावे.या कामी दुर्लक्ष करू नये असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले .
जिल्ह्यातील जनगणनेचा पहिला टप्पा (घरयादी व घरगणना) दिनांक १६ मे ते १४ जून दरम्यान होणार असून नागरिकांना घरबसल्या स्वयंगणना दिनांक १ मे ते १५ मे दरम्यान करता येणार आहे. यावेळची जनगणना ही प्रथमच डिजिटल पद्धतीने करण्यात येणार असून त्यासाठी CMMS पोर्टल व स्वतंत्र ॲप विकसित करण्यात आले आहे. यासाठी आवश्यक मनुष्यबळ नेमण्यात आले असून जिल्ह्यातील १२ तालुके व १३ नगरपालिका/ नगरपंचायतींसाठी सुमारे ५६९५ प्रगणक व तर ९८९ पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत.
काल जिल्ह्यातील ९० क्षेत्रीय प्रशिक्षकांना मास्टर ट्रेनर श्रीमती रूपाली सुर्यवंशी (तहसीलदार – गगनबावडा) व सांख्यिकी अधिकारी गजानन पाटील यांनी प्रशिक्षण दिले . यावेळी तहसीलदार (करमणूक) श्रीमती तेजस्वीनी पाटील,नायब तहसीलदार नितीन धापसे – पाटील, करमणूक कर निरीक्षक श्री प्रकाश जाधव यांच्यासह करमणूक कर विभागाचे इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय
Comments are closed.

Check Also

गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकावर तात्काळ बंदी घाला ! – हिंदुत्वनिष्ठांची आंदोलनाद्वारे मागणी

गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकावर तात्काळ बंदी घाला ! – हिंदुत्वनिष…