Home Uncategorized अयोध्या येथे गौतम अदाणी यांनी श्रद्धा आणि सेवेचा पुनरुच्चार करत भारताच्या सजीव परंपरांना दिला मान

अयोध्या येथे गौतम अदाणी यांनी श्रद्धा आणि सेवेचा पुनरुच्चार करत भारताच्या सजीव परंपरांना दिला मान

28 second read
0
0
25

no images were found

अयोध्या येथे गौतम अदाणी यांनी श्रद्धा आणि सेवेचा पुनरुच्चार करत भारताच्या सजीव परंपरांना दिला मान

Oplus_131072

अयोध्या, : अदाणी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदाणी यांनी आपल्या कुटुंबासह—पत्नी प्रिती अदाणी, ज्येष्ठ पुत्र करण अदाणी आणि सून परिधी अदाणी —अयोध्येला भेट देत श्री राम मंदिर येथे दर्शन घेतले आणि प्रार्थना अर्पण केली. भगवान राम यांच्या जन्मभूमीवर वसलेले हे मंदिर श्रद्धा, भक्ती आणि सांस्कृतिक सातत्याचे प्रतीक मानले जाते.

       हनुमान जयंती च्या निमित्ताने झालेल्या या भेटीबाबत श्री. अदाणी यांनी ती एक अत्यंत वैयक्तिक आणि भावनिक क्षण असल्याचे सांगितले, ज्यात श्रद्धा आणि व्यापक राष्ट्रीय भावना यांचा संगम दिसून येतो.

       दर्शनाचा अनुभव “अत्यंत भावनिक आणि अभिमानास्पद” असल्याचे सांगताना त्यांनी या स्थळाला केवळ धार्मिक ठिकाण न मानता भारताच्या सांस्कृतिक सातत्य, एकता आणि वाढत्या आत्मविश्वासाचे प्रतीक म्हणून अधोरेखित केले. तसेच भगवान राम यांच्या प्रामाणिकपणा, कर्तव्य आणि सेवाभाव या मूल्यांना राष्ट्राच्या पुढील प्रवासासाठी मार्गदर्शक तत्त्वे म्हणून त्यांनी नमूद केले.

       या चिंतनाला पुढे नेत त्यांनी श्री निशुल्क गुरुकुल महाविद्यालय येथे भेट देत संस्थात्मक संवाद साधला. मंदिरापासून सुमारे १० मिनिटांच्या अंतरावर असलेली ही संस्था भारताच्या ज्ञानपरंपरेचे जिवंत उ\दाहरण आहे.

        १९३५ साली स्वामी त्यागानंद जी यांनी स्थापन केलेली ही संस्था आर्य समाज च्या तत्त्वांवर आधारित आहे, जी वैदिक शिक्षण, सामाजिक उन्नती आणि सर्वांसाठी सुलभ शिक्षणावर भर देते. येथे पारंपरिक गुरुकुल पद्धतीनुसार निवासी शिक्षण दिले जाते, ज्यात विद्यार्थी गुरुंच्या मार्गदर्शनाखाली राहून शिक्षण घेतात.

       श्री. अदाणी यांनी विद्यार्थ्यांशी आणि शिक्षकांशी संवाद साधत शिस्त, जिज्ञासा आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाचा अनुभव घेतला. “मूल्यांवर आधारित शिक्षण केवळ व्यक्ती घडवत नाही, तर राष्ट्राचे भविष्य घडवते. उद्याच्या संधींसाठी तयारी करताना या परंपरा जपण्याची आपली जबाबदारी आहे,” असे त्यांनी सांगितले. देश एआय-आधारित भविष्यात वेगाने पुढे जात असताना भारताच्या ज्ञानप्रणाली जपण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. तसेच अदाणी फाउंडेशन गुरुकुल प्रणालीला बळकटी देण्यासाठी एआय-सक्षम प्रयोगशाळा उभारण्यास मदत करणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

       सुमारे २०० विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षण उपलब्ध करून देणारी ही संस्था ज्ञान सर्वांसाठी सुलभ आणि समावेशक ठेवण्याचे कार्य करते. परिसरात गोशाळाही असून सांस्कृतिक, पर्यावरणीय आणि ग्रामीण मूल्यांचा समन्वय येथे दिसून येतो. या संस्थेला ऐतिहासिक वारसा लाभला असून महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांसारख्या नेत्यांनी येथे पूर्वी भेट दिली होती.

     विद्यार्थ्यांनी एकसुरात संस्कृत श्लोकांचे पठण करताना निर्माण झालेला नाद संपूर्ण परिसरात घुमत होता, ज्यातून शिस्त आणि श्रद्धा यांचा सुंदर संगम दिसून आला. त्यांच्या सोबत बसून श्री. अदाणी यांनी बारकाईने निरीक्षण केले आणि शिक्षकांशी संवाद साधला, ज्यातून शिक्षण हे केवळ वर्गखोल्यांपुरते मर्यादित नसून दैनंदिन जीवनाचा भाग असल्याचे स्पष्ट झाले.

        श्री. अदाणी यांच्यासाठी हे मूल्य ‘सेवा’ या तत्त्वज्ञानातून व्यक्त होतात, ज्याला ते “सेवा ही साधना आहे” असे म्हणतात—जिथे सेवा ही केवळ कृती नसून नम्रता, जबाबदारी आणि उद्देश यांवर आधारित सातत्यपूर्ण बांधिलकी असते.

         आजची ही भेट त्यांच्या या परंपरांशी असलेल्या सातत्यपूर्ण नात्याचा भाग असून, मागील वर्षी प्रयागराज येथे झालेल्या महा कुंभमेळा आणि पुरी येथील जगन्नाथ रथयात्रा मधील सहभागाचाही त्यात समावेश आहे. तसेच भारताच्या इतिहास, भाषा, तत्त्वज्ञान आणि सांस्कृतिक वारशाच्या सखोल अभ्यासाला प्रोत्साहन देणाऱ्या इंडोलॉजी उपक्रमांना दिलेल्या त्यांच्या पाठिंब्याचाही यात समावेश आहे.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…