Home शासकीय राज्यात दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय

राज्यात दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय

0 second read
0
0
64

no images were found

राज्यात दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय

मुंबई : राज्यात्त दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी मान्यता दिली आहे. देशपातळीवर हा मोठा निर्णय असल्याचं आ .बच्चू कडू यांनी सांगितले.
कालच मंत्रालयामध्ये दिव्यांगांसंदर्भात बैठक झाली. याच बैठकीमध्ये राज्यात दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याच्या निर्णयाला मान्यता देण्यात आली आहे. आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. देशात पहिल्यांदाच राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं. आपण आज मंत्रालयासमोर लाडू वाटणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.
”ज्यांना हात नाहीत, पाय नाहीत, चालता-बोलता येत नाही, दिसत नाही त्यांच्यासाठी हा मोठा निर्णय आहे. दिव्यांगांच्या लढ्यामध्ये हे आमचं मोठं यश आहे” अशा भावना आमदार कडूंनी व्यक्त केल्या. या मंत्रालयाची जबाबदारी बच्चू कडू यांच्याकडेच येईल, असं राजकीय जाणकार सांगत आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

 ‘पुष्पा इम्पॉसिबल’ मध्ये पुष्पाचा कायद्याचा अभ्यास करण्याचा निर्धार

 ‘पुष्पा इम्पॉसिबल’ मध्ये पुष्पाचा कायद्याचा अभ्यास करण्याचा निर्धार पुष्पाच्या हृदयस…