Home Video नुसत्या टॅगलाईन काढून कोल्हापूरचा विकास होणार नाही; कोल्हापूरच्या विकासासाठी महायुतीच सक्षम :क्षीरसागर.    

नुसत्या टॅगलाईन काढून कोल्हापूरचा विकास होणार नाही; कोल्हापूरच्या विकासासाठी महायुतीच सक्षम :क्षीरसागर.    

1 min read
0
0
22

no images were found

नुसत्या टॅगलाईन काढून कोल्हापूरचा विकास होणार नाही; कोल्हापूरच्या विकासासाठी महायुतीच सक्षम :क्षीरसागर.             कोल्हापूर (प्रतिनिधी): निवडणूक आली की आमदार सतीश पाटील कोणती ना कोणती टॅगलाईन काढून प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा प्रयत्न करतात ,पण नुसत्या टॅगलाईन काढून कोल्हापूरचा विकास होणार नाही .कोल्हापूरचा विकास करायला महायुती सक्षम आहे. त्याचमुळे महायुतीच्या वाढत्या प्रभावाने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याची टीका राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली. शिवालय ,शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेतील बोलत होते.                                                                      यावेळी बोलताना आमदार राजे क्षीरसागर म्हणाली की, सतीश पाटील यांनी 2005 पासून सत्तेत असल्याची कबूल केली, हे करत असताना मात्र त्यांनी स्वतःच्या अपयशाची खापर मात्र नेहमीप्रमाणे दुसऱ्यावर फोडण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या सहा वर्षाच्या कालावधीत मी आमदार नसताना देखील कोट्यावधी रुपयांचा निधी आणला कोल्हापूर जिल्ह्याचे शहराचा विचार करता पूर्ण नियंत्रण प्रकल्प, कन्वेंशन सेंटर, सर्किट बेच ,श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा ,आयटी पार्क ,मंजुरी अमृत 2.0 योजनेतून मला निसारण प्रकल्प 100 कोटींचे रस्ते असे अनेक प्रश्न  मार्गी लावले  आहेत.त्याचमुळे महायुतीचा पारदर्शी कारभार आमदार सतीश पाटील यांच्या डोळ्यात खूपतआहे. गेले वीस वर्षे सत्तेत असताना आमदार सतीश पाटील यांनी शहरातील रस्ते पार्किंग व्यवस्था, कचरा व्यवस्थापन , उद्यानाचे सुशोभीकरण का दिसले नाही किंवा त्यांनी यावर उपाययोजना का केल्या नाहीत याचाही पंचनामा त्यांनी जनतेसमोर मांडणे गरजेचे आहे.                                                                                गेल्या गणेशोत्सवात आमदार सतीश पाटील यांच्या अभ्यंग स्नानाची थेट पाईपलाईन बंद पडली. शहरातील माता भगिनी पाण्यासाठी रस्त्यावर उतरत होत्या, त्यावेळी हे महाशय कुठे गायब होते .पण शिवसेनेने तातडीने पाणीपुरवठ्याची पर्यायी यंत्रणा सुरू करून पाणीपुरवठा सुरळीत केला एवढ्यावर न थांबता पर्यायी यंत्रणा सक्षम असावी ,यासाठी निधीही दिला ,हे महायुतीचे काम आहे.     
      गेले अनेक वर्षे कोल्हापूर महापालिकेतील कंत्राटी कर्मचारी न्यायाच्या प्रतीक्षेत होते. तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री नामदार माननीय श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचे काम आम्ही केले.यासह के. एम. टी .मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही सेवेत कायम करण्याची काम शिवसेना महायुतीचेच आहे, संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेबांनी तात्काळ या ठिकाणी भेट देऊन कोल्हापूरची अस्मिता पुन्हा नव्या दमाने उभी राहण्यासाठी निधी मंजूर केला. याचे काम दर्जेदारच असावी असा कलाप्रेमींचा आग्रह आहे ,आणि त्यांच्या सूचनांचा आदर करूनच हे काम पूर्ण केले जात आहे .येत्या 31 मार्च पर्यंत हे काम पूर्ण होईल याची कल्पना कदाचित आदरणीय खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी आमदार सतीश पाटील यांना दिली नसावी ,असा टोलाही आमदार राजेश क्षीरसागर यांनी लगावला.
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Video
Comments are closed.

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…