no images were found
बिहार निवडणुकीत एनडीएचाच वर चष्मा : खासदार धनंजय महाडिक
कोल्हापूर (प्रतिनिधी):पुन्हा एकदा देशातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप प्रणित एनडीए सरकारवर पूर्ण विश्वास दाखवला आहे. बिहार निवडणुकीच्या निकालाने, विरोधकांच्या अपप्रचाराला आणि धूर्तपणाला लगाम घातला आहे. या देशातील मतदार जनता सुज्ञ आहे. म्हणूनच केंद्रासह देशभरातील अनेक राज्यांमध्ये भाजपाची विजयी घोडदौड सुरू आहे. कुणी कितीही वल्गना केल्या तरी, डिजिटल भारत- आत्मनिर्भर भारत- स्वदेशी वापरणारा भारत आणि कणखर भारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घडवला आहे. भाजपाचा जनाधार वाढत असून, महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये त्याचा मोठा परिणाम दिसून येईल.