no images were found
अदाणी समूहाचे चेअरमन गौतम अदाणी यांचा भागधारकांना संदेश
24 जानेवारी 2023 ची सकाळ अशी होती, जी कधी विसरता येणार नाही. त्या दिवसाच्या बातम्या फक्त दलाल स्ट्रीटपुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत, तर त्यांनी संपूर्ण देश आणि जगालाही हादरवून टाकले. हिंडनबर्गचा अहवाल हा फक्त अदाणी समूहावर प्रश्नचिन्ह नव्हता, तर भारतीय कंपन्यांच्या त्या धाडसावरही आघात होता, ज्यांच्याकडे जागतिक स्तरावर मोठे स्वप्न पाहण्याची क्षमता आहे.
आमच्यासाठी तो काळ एक कसोटीचा होता, ज्यात आमची ताकद आमच्या प्रशासनापासून आमच्या ध्येयांपर्यंत प्रत्येक स्तरावर तपासली गेली आणि इतकेच नव्हे तर या विचारापर्यंत की भारतीय कंपन्या खरोखर जगाचे नेतृत्व करू शकतात का.
परंतु गेल्या आठवड्यात सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) आमच्यावरील आरोप निराधार असल्याचा स्पष्ट आणि अंतिम निर्णय दिला
शेवटी सत्य समोर आले आणि जसे आम्ही नेहमी म्हटले आहे – “सत्यमेव जयते”.
आम्हाला खाली खेचण्यासाठी जे केले गेले होते त्यामुळे आमचा पाया मजबूत झाला.
ही फक्त एक नियामक मंजुरी नाही, तर याचा अर्थ असा आहे की आमची कंपनी नेहमी पारदर्शकता, प्रशासन आणि स्पष्ट ध्येय यांसह काम करत आली आहे. आमची खरी ताकद केवळ शब्दांत नाही, तर या काळात दाखवलेल्या कामगिरीत आहे.
एबिट्डा वाढ (एबीआयटीडीए): आमच्या पोर्टफोलिओचा एबिट्डा आर्थिक वर्ष 2023 मध्ये 57,205 कोटी होता, जो आर्थिक वर्ष 2025 मध्ये वाढून 89,806 कोटींवर पोहोचला. म्हणजेच ही वाढ 32,601 कोटींची आहे, जी सुमारे 57% वाढ आणि दोन वर्षांत 25% सीएजीआर आहे.
मालमत्तेचा विस्तार: आमचा एकूण निधी आर्थिक वर्ष 2023 मध्ये 4,12,318 कोटींवरून वाढून आर्थिक वर्ष 2025 मध्ये 6,09,133 कोटींवर गेला. ही अंदाजे 2 लाख कोटींची वाढ आहे आणि फक्त दोन वर्षांत 48% वाढ झाली आहे.
याच काळात आम्ही अनेक मोठी कामे पूर्ण केली, ज्यांनी केवळ भारताच्या इन्फ्रास्ट्रक्चरला नवीन रूप दिले नाही, तर त्याची जागतिक ओळखही अधिक मजबूत केली:
· केरळमधील विझिंजम येथे देशाचा पहिला कंटेनर ट्रान्सशिपमेंट पोर्ट सुरू केला, तसेच कोलंबो वेस्ट इंटरनॅशनल टर्मिनलही सुरु केले.
· 6 गीगावॉट नवीकरणीय ऊर्जा क्षमता वाढवली, ज्यात खावडा प्रकल्पाचा समावेश आहे, जो जगातील सर्वात मोठा एकाच ठिकाणी असलेला रिन्यूएबल प्रोजेक्ट आहे.
· जगातील सर्वात मोठा कॉपर स्मेल्टर आणि मेटलर्जिकल कॉम्प्लेक्स उभारला.
· भारत आणि विदेशात 7,000 सर्किट किलोमीटर ट्रान्समिशन लाईन्स आणि 4 गीगावॉट नवी थर्मल क्षमता वाढवली.
जी दुखापत आम्हाला देण्यासाठी करण्यात आली होती, तीच आमच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरली. यामुळे आमचा पाया मजबूत झाला, आमची स्वप्ने आणखी वाढली आणि आम्हाला हा आत्मविश्वास मिळाला की भारताच्या भविष्यासाठी आम्ही वेगाने आणि ठामपणे पुढे जाऊ.
वादळ कितीही मोठे असले तरी, तरी मला नेहमी जाणवत होतं की यामुळे आमच्या गुंतवणूकदार, बँकर्स, पुरवठादार आणि भागीदारांच्या मनात चिंता निर्माण झाली. पण, तुमचा विश्वासच आमची सर्वात मोठी ताकद ठरली. तुमच्या संयमाने आम्हाला आधार दिला आणि तुमच्या विश्वासाने आम्हाला अधिक मजबूत केले. या पाठिंब्याबद्दल मी मनापासून आभारी आहे.
आगामी काळाकडे पाहताना, मी वचन देतो की आम्ही:
· अशा गव्हर्नन्सच्या मानकांची स्थापना करू, जी प्रत्येक बाजारपेठेत आणि नियामक संस्थेत विश्वास निर्माण करतील.
· इनोव्हेशन आणि सस्टेनेबिलिटीला अधिक गती देऊ, ज्यामुळे आम्ही फक्त भारतातच नव्हे तर जगभरात नवीन बेंचमार्क स्थापित करू.
· राष्ट्रनिर्माणावर दुप्पट भर देऊ आणि अशा पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करू, ज्यामुळे भारताच्या दीर्घकालीन विकासकथेची गती वाढेल.
हा क्षण फक्त विश्वास परत मिळवण्याचा नाही, तर हे आठवण करून देण्याचा आहे की तुमची कंपनी कोणत्या मूल्यांवर उभी आहे – कठीण परिस्थितीत स्थैर्य दाखवणे, कामात प्रामाणिकपणा ठेवणे आणि भारत व जगाच्या उज्ज्वल भविष्यासाठी ठाम बांधिलकी.