Home मनोरंजन पात्रांची अवस्था दयनीय झाली!

पात्रांची अवस्था दयनीय झाली!

3 min read
0
0
10

no images were found

पात्रांची अवस्था दयनीय झाली!

एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका ‘हप्‍पू की उलटन पलटन’ आणि ‘भाबीजी घर पर है’मध्‍ये पात्रं तणावपूर्ण व विनोदी स्थितींमध्‍ये अडकतात. मालिका ‘हप्‍पू की उलटन पलटन’मधील आगामी एपिसोडबाब‍त दरोगा हप्‍पू सिंग ऊर्फ योगेश त्रिपाठी म्‍हणाले, ”अवधेशिया (उर्मिला शर्मा) एक विचित्र सत्य उघड करते की, राजेशला (गीतांजली मिश्रा) सशासारख्या दातांची खूप भिती वाटते. ते पाहिल्यावर तिला पॅनिक अटॅक येतात, ज्यामुळे तिचे मानसिक संतुलन बिघडते आणि ती नियंत्रणाबाहेर जाते. दरम्यान, डेण्टिस्‍टने चुकून पत्‍नीचे दात काढल्यानंतर कमिशनर (किशोर भानुशाली) त्‍याच्‍यावर संतापतो आणि बिचाऱ्या हप्पूला (योगेश त्रिपाठी) त्याच्या बॉसच्या रागाचा सामना करावा लागतो. परिस्थिती अधिक बिकट होते, जेथे हप्‍पूचे एका स्‍थानिक गुंडासोबत भांडण होते. तो हप्‍पूला इतकी मारहाण करतो की, त्‍याचे दात पडतात. हप्‍पू त्‍या स्थितीत घरी आल्‍यानंतर राजेश त्‍याला पाहून घाबरते. तिला आता सर्वजण भयानक दात असल्‍याचे दिसू लागतात आणि ती तिच्या आजुबाजूच्या सर्वांसह कटोरी अम्मावर (हिमानी शिवपुरी) हल्ला करते. कुटुंब एका डेण्टिस्‍टशी संपर्क साधतात, तो स्पष्टपणे सांगतो की हप्पूच्या दातांच्या नसा सुजल्या आहेत आणि त्याला किमान एक महिना असेच राहावे लागेल. उपाय शोधण्याच्या प्रयत्‍नात असलेले कुटुंब राजेशसाठी मानसोपचारतज्ज्ञाला बोलावतात, जो तिला रस्‍सीने बांधून ठेवून तिच्या भीतीचा सामना करण्याचा विलक्षण उपाय सुचवतो. हप्पू संकोच करत राजेशला रस्‍सीने बांधतो आणि दात दाखवतो. ती ओरडते, रस्सी सोडते आणि घराभोवती त्याचा पाठलाग करते. हप्पूला वाटते की तो सुरक्षित आहे, त्याच वेळी कटोरी अम्मा त्याला मागून पकडते, तर राजेश ओरडत राहते. सुदैवाने हप्पूचे दात शेवटी सामान्य होतात. पण संकट संपलेले नसते, कारण राजेश आता सामान्य दातांना देखील घाबरते! तिचा सामना करण्यासाठी संपूर्ण कुटुंब घरात बनावट दात घालू लागतात. मानसोपचारतज्ज्ञ दुसऱ्यांदा परत येतो, यावेळी संमोहित करून राजेशला ड्रॅक्युलाच्या चित्राकडे पाहण्यास भाग पाडतो आणि आश्‍चर्याची गोष्‍ट म्हणजे, ती आता सामान्य आणि विचित्र दोन्ही दातांना घाबरते, पण ड्रॅक्युलाचे दात तिला ठीक वाटतात. आता कुटुंब काय करेल?”

मालिका ‘भाबीजी घर पर है’च्‍या आगामी एपिसोडबात अंगूरी भाबी ऊर्फ शुभांगी अत्रे म्‍हणाल्‍या, ”विभुतीला (आसिफ शेख) विचित्र स्वप्‍न पडते, ज्यामध्ये तो अंगूरीला (शुभांगी अत्रे) मृत्युदंडाची शिक्षा सुनावल्‍याचे पाहतो. अनिता (विदिशा श्रीवास्तव) स्पष्ट करते की एखाद्याच्या मृत्यूचे स्वप्‍न पाहिल्याने त्यांचे आयुष्यमान वाढते, पण विभुतीला चिंता भेडसावत राहते आणि अंगूरीच्या सुरक्षिततेबद्दल काळजी करू लागतो. दरम्यान, अंगूरी तिवारीच्या (रोहिताश्‍व गौड) विश्‍वासाची परीक्षा घेते, ज्‍यामध्‍ये तो उत्तीर्ण होतो. पण अम्मा (सोमा राठोड) इशारा देते की, अंगूरीची काळजी घेतली नाही तर तिच्या जीवाला धोका आहे. तिवारी तिच्‍यावर विश्‍वास ठेवत नाही. लवकरच, अंगूरीच्‍या बाबतीत विलक्षण व जीवाला धोकदायक अपघातांची मालिका सुरू होते आणि प्रत्‍येकवेळी विभुती तिला वाचवतो. तो तिवारीला या संकटांबाबत सांगतो तेव्‍हा घाबरून गेलेला तिवारी धाडसी चेहरा दाखवतो आणि विभुतीच्‍या चिंता दूर करतो. तो त्‍याच्‍यावर काहीच परिणाम न झाल्‍याचे नाटक देखील करतो आणि अंगूरीच्‍या सुरक्षिततेसाठी तिला घरात लॉक करण्‍याचा सल्‍ला देतो. चोरीच्‍या चौकशीच्‍या बहाण्‍याने तिवारी पोलिसांना त्‍याच्‍या घरी बोलावतो. शोध सुरू असताना पोलिसांना अंगूरीच्‍या कपाटात चोरी केलेली बांगडी सापडते. सर्वांना धक्का बसतो, तिवारी पोलिसांना अंगूरीला अटक करण्‍यास सांगतो. पण अनिता विरोध करते आणि स्‍पष्‍टीकरणासाठी अम्‍माला बोलावण्‍यास सांगते. पण अम्‍मा देखील अंगूरीला दोषी मानते. पोलिस अंगूरीला अटक करतात आणि विभुती हस्‍तक्षेप करण्‍याचा प्रयत्‍न करतो तेव्‍हा पोलिस त्‍याला देखील मारहाण करतात. दरम्यान कंत्राटदार पाण्‍याची पाईपलाइन खोदण्‍यासाठी टीका (वैभव माथूर) आणि मल्‍खान (विपिन हीरो) यांना नियुक्‍त करतो. पण ब्‍लूप्रिंट गुंतागूंतीची असल्‍याने त्‍यांना काहीच समजत नाही. घरी, तिवारीला अंगूरीला खोट्या आरोपामध्‍ये फसवल्‍याबद्दल दोषी वाटते आणि मास्‍टरजीला त्‍याला शिक्षा करण्‍यास देखील सांगतो. विभुतीला अस्‍वस्‍थ वाटते आणि तो हप्‍पूला (योगेश त्रिपाठी) भावनिक होऊन ब्‍लॅकमेल करतो की, त्‍याला पोलिस स्‍टेशनमध्‍ये अंगूरीला काहीतरी खाण्‍यास देण्‍याची परवानगी द्यावी. पण विभुती अंगूरीला पराठा खाण्‍यास देतो तेव्‍हा ती नकार देत म्‍हणते, ‘तिवारीजींनी काहीही खाल्‍ले नसेल’. रागाच्‍या भरात विभुती तिवारीच्‍या घरी जातो आणि त्‍याला जबरदस्‍तीने पराठे खायला देतो. त्‍यानंतर तो अंगूरीकडे परत येतो आणि तिला पराठे खाण्‍यास समजावतो. अनिता अंगूरीला जामीन देण्‍याचे ठरवते आणि सक्‍सेनाला (सानंद वर्मा) तिचा वकिल म्‍हणून नियुक्‍त करते. पण, विभुतीच्‍या पण विभुतीच्या अधीरतेमुळे निराश झालेला सक्सेना त्याला कोर्टामध्ये येऊ देत नाही. दरम्यान, टीका आणि मल्‍खान चुकीच्या ठिकाणी खड्डा खणतात, ज्यामुळे कंत्राटदाराला राग येतो, प्रेम (विश्‍वजीत सोनी) मध्यस्थी केल्यानंतर तो शांत होतो. कोर्टामध्‍ये, न्यायाधीश निकाल जाहीर करणार असताना विभुती धावत आत येतो आणि मान्‍य करतो की, त्यानेच बांगडी चोरली होती. न्‍यायाधीश विभुती आणि अंगूरी दोघांनाही पोलिस कोठडीत पाठवण्‍याची शिक्षा देतात! बाहेर, अनिता सक्सेनाला सांगते की ती त्यांना तुरुंगातून बाहेर काढण्याची योजना आखत आहे. तिवारी योजना ऐकतो आणि लगेच हप्पूला कळवतो. अनिता टीका आणि मल्‍खानला पोलिस कोठडीमध्ये बोगदा खोदण्यासाठी सांगते. पण विभुती आणि अंगूरी बाहेर येताच हप्पू सिंग त्यांना पुन्हा अटक करतो! अंगूरी आणि विभुती तुरुंगातून कसे बाहेर येतील?”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

व्यावसायिक संधींचा फायदा घेऊन व्यवसाय विस्तारा मिथिलेश पांडे – सराफ संघाची कार्यशाळा उत्साहात

  व्यावसायिक संधींचा फायदा घेऊन व्यवसाय विस्तारा मिथिलेश पांडे – सराफ संघाची कार्यशाळ…