Home मनोरंजन हम पांच’ फेम आणि अनुभवी अभिनेत्री वंदना पाठक पाच वर्षांनंतर टेलिव्हिजनवर पुनरागमन करत आहेत झी टीव्हीवरील ‘तुम से तुम तक’ मालिकेसह!

हम पांच’ फेम आणि अनुभवी अभिनेत्री वंदना पाठक पाच वर्षांनंतर टेलिव्हिजनवर पुनरागमन करत आहेत झी टीव्हीवरील ‘तुम से तुम तक’ मालिकेसह!

21 second read
0
0
11

no images were found

हम पांच फेम आणि अनुभवी अभिनेत्री वंदना पाठक पाच वर्षांनंतर टेलिव्हिजनवर पुनरागमन करत आहेत झी टीव्हीवरील ‘तुम से तुम तक’ मालिकेसह!

अशा समाजात जिथे नाती आणि लग्न अनेकदा वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरांच्या आधारे ठरवले जातात, आणि जिथे वय, आर्थिक स्थिती आणि सामाजिक पार्श्वभूमी अशा घटकांना खूप महत्त्व दिले जाते – तिथे प्रेम मात्र कोणतेही नियम मानत नाही. ते स्वतःचा मार्ग स्वतः ठरवतं आणि वाटेत येणाऱ्या अडथळ्यांना पार करतं. अनेक दशकांपासून अशा प्रगतीशील आणि भावनिकदृष्ट्या प्रभावी कथानकांसाठी झी टीव्ही वाहिनी ओळखली जाते. ही वाहिनी आता एक नवीन आणि भावस्पर्शी कल्पनारम्य मालिका – ‘तुम से तुम तक’ प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहे. ही अपारंपरिक प्रेमकथा दोन अतिशय भिन्न व्यक्तिमत्त्वांमधील असामान्य नात्याभोवती फिरते – अनु, एक 19 वर्षांची उत्साही आणि साधी पार्श्वभूमी असलेली तरुणी आणि आर्यवर्धन, एक 46 वर्षांचा शिस्तप्रिय, स्वतःच्या मेहनतीवर उभा राहिलेला उद्योगपती. त्यांचे नाते सामाजिक अपेक्षांना आव्हान देते आणि प्रेम, वय आणि स्वीकार यासारख्या गोष्टींवर प्रश्न उपस्थित करते.

या मालिकेत निहारिका चौक्सी आणि शरद केळकर हे अनु आणि आर्यवर्धनच्या भूमिकेत दिसणार आहेत, तर लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री वंदना पाठक यांचे 5 वर्षांनंतर टेलिव्हिजनवरील पुनरागमन ह्या नाट्यामध्ये एक एक नवीन गहराई घेऊन येईल. त्या या कथेत गायत्री देवीची भूमिका साकारणार आहेत – एक शक्तिशाली मातृछाया जिच्या व्यक्तिमत्त्वात सौम्यता आणि करुणा आहे. ऐश्वर्य असूनही मूळ तत्वांवर विश्वास ठेवणाऱ्या गायत्री देवींची सर्वात मोठी इच्छा म्हणजे आर्यवर्धनचं सुखी वैवाहिक आयुष्य पाहणे. त्यांच्या उपस्थितीमुळे कथेला एक हृदयस्पर्शी आणि कौटुंबिक ऊब मिळते.

वंदना पाठक म्हणाल्या, झी टीव्ही हे माझ्यासाठी घरासारखं आणि मनासारखं आहे – कारण ‘हम पांच’ या मालिकेसह मी तीन दशकांपूर्वी इथेच माझा टेलिव्हिजन प्रवास सुरू केला. या शोने मला ओळख दिली आणि अशा अनेक आठवणी दिल्या ज्या अजूनही माझ्या मनात जिवंत आहेत. इतक्या वर्षांच्या प्रवासानंतर पुन्हा या वाहिनीवर येणे हा एक भावनिक क्षण आहे. खरंतरटेलिव्हिजनवरील माझा पाच वर्षांपूर्वी शेवटचा शोही झी टीव्हीवरच होता! या ब्रेकनंतर काही अर्थपूर्ण कामासाठी मी वाट पाहत होते आणि ‘तुम से तुम तक’ माझ्यासाठी अगदी योग्य वाटलं. ही कथा खूपच सुंदरथरारक आणि भावनांनी भरलेली आहे. गायत्री देवीचं पात्र वाचल्याक्षणी मला जाणवलं की हे पात्र अगदी माझ्यासाठीच आहे. तिची ताकद आणि दयाळूपणा मला खूप भावला आणि हे पात्र साकारण्याची संधी मिळावी असं मला वाटलं. आता सेटवर परत येऊन प्रेक्षकांशी पुन्हा एकदा जोडल्या जाण्याची आणि काहीतरी खास सादर करण्याची मी आतुरतेने वाट पाहते आहे. माझ्या कारकिर्दीत प्रेक्षकांनी मला जेवढं प्रेम दिलंतेवढंच प्रेम पुन्हा मिळेलहीच माझी अपेक्षा आहे – आणि तेच माझ्यासाठी खूप आहे.”

जसजशी ‘तुम से तुम तक’ची कथा उलगडत जाईल, तसतसे प्रेक्षक प्रेम, अंतर्गत संघर्ष आणि सामाजिक अपेक्षांच्या ओझ्यामुळे त्यातील भावनिक चढ-उतार अनुभवतील. अनु आणि आर्यवर्धनचं प्रेम कौटुंबिक अपेक्षा, भावनिक गोंधळ आणि समाजाच्या निर्णयांपुढे तग धरू शकेल का?

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

व्यावसायिक संधींचा फायदा घेऊन व्यवसाय विस्तारा मिथिलेश पांडे – सराफ संघाची कार्यशाळा उत्साहात

  व्यावसायिक संधींचा फायदा घेऊन व्यवसाय विस्तारा मिथिलेश पांडे – सराफ संघाची कार्यशाळ…