no images were found
सॅमसंग इंडियाकडून ‘सॉल्व्ह फॉर टूमारो २०२५’ स्पर्धा लाँच, १ कोटी रूपयांहून अधिक अनुदान
·
गुरूग्राम: सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने आपल्या सॅमसंग ‘सॉल्व्ह फॉर टूमारो’ उपक्रमाच्या चौथ्या एडिशनचे अनावरण केले. ही देशव्यापी स्पर्धा विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा फायदा घेत समाजातील सर्वात प्रचलित आव्हानांचे निराकरण करण्यासाठी नाविन्यपूर्ण सोल्यूशन निर्माण करण्यास प्रेरित करण्याकरिता डिझाइन करण्यात आली आहे.
सॅमसंग ‘सॉल्व्ह फॉर टूमारो २०२५’ चार विजेल्या टीम्सना १ कोटी रूपये अनुदान देईल, ज्यामुळे त्यांना त्यांच्या प्रकल्पांच्या इन्क्यूबेशनसाठी मदत होईल, तसेच प्रत्यक्ष प्रोटोटाइप्रिंग, गुंतवणूकदार कनेक्ट्स आणि सॅमसंग लीडर्स व आयआयटी दिल्ली फॅकल्टीकडून तज्ञ मार्गदर्शन मिळेल.
या सन्मानामधून स्पर्धेमध्ये निपुण होण्यासोबत त्यापलीकडे जाणारे सोल्यूशन्स अधिक उत्तम करण्याचे महत्त्व दिसून येते, ज्यामुळे ते स्केलेबल व शाश्वत उद्यमांमध्ये विकसित होतील, जे भारतभरातील समुदायांना आकार देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील.
सहा महिने राबवण्यात येणारा हा उपक्रम १४ ते २२ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना वैयक्तिक किंवा ग्रुप म्हणून त्यांच्या टेक संकल्पनांना सबमिट करण्याचे आवाहन करतो. या वर्षी सहभागींना चार प्रमुख थीम्समध्ये सोल्यूशन्स डिझाइन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे: सुरक्षित, स्मार्टर व सर्वसमावेशक भारतासाठी एआय, भारतातील आरोग्य, स्वच्छता व स्वास्थ्याचे भविष्य, शिक्षणासाठी क्रीडा व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सामाजिक बदल आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य व पर्यावरणीय स्थिरता.
“सॉल्व्ह फॉर टूमारोसह आम्ही भारताच्या कानाकोपऱ्यामधील तरूण इनोव्हेटर्सना मोठे स्वप्न पाहण्यास, वास्तविक विश्वातील आव्हानांचे निराकरण करण्यास आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्मार्टर, अधिक सर्वसमावेशक भविष्य घडवण्यास प्रेरित करत आहोत. यंदा, सॉल्व्ह फॉर टूमारो अधिक मोठे आणि अधिक सर्वसमावेशक असणार आहे. आम्ही अधिकाधिक शहरांपर्यंत पोहोचत आहोत, अधिकाधिक शाळा व कॉलेजमधील विद्यार्थ्यांशी संलग्न होत आहोत आणि त्यांच्यासाठी इनोव्हेट करण्याकरिता मार्ग निर्माण करत आहोत, तसेच डिझाइन थिंकिंगच्या तत्त्वांचा अवलंब करत आहोत. सॉल्व्ह फॉर टूमारोमधून भारत सरकारच्या अग्रगण्य #DigitalIndia उपक्रमाप्रती आमची अविरत कटिबद्धता दिसून येते, जो तरूणांना भावी आर्किटेक्ट्स बनण्यास सक्षम करतो,” असे सॅमसंग साऊथवेस्ट एशियाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी जेबी पार्क म्हणाले.
“आयआयटी दिल्लीला तरूणांमध्ये नाविन्यता, उद्योजकता आणि वास्तविक विश्वातील समस्या निवारण क्षमतेला चालना देण्याचा आनंद होत आहे. सॉल्व्ह फॉर टूमारोसोबतचा आमचा सहयोग मार्गदर्शन, संशोधन पायाभूत सुविधा व टेक्निकल मार्गदर्शन देतो, ज्यामुळे तरूणांना त्यांच्या संकल्पनांना उत्पादनांमध्ये रूपांतरित करण्यास मदत होते, ज्यांचा समाजावर मोठा प्रभाव पडतो. आम्हाला या उपक्रमाचा भाग असण्याचा आनंद होत आहे, जो सामाजिकदृष्ट्या जागरूक इनोव्हेशनला सक्षम करतो आणि ‘विकसित भारता’प्रती योगदान देतो,” असे आयआयटी दिल्लीचे संचालक प्रो. रंगन बॅनर्जी म्हणाले.
“भारतातील तरूण इनोव्हेटर्स २०३० पर्यंत सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स साध्य करण्यासाठी आणि २०४७ पर्यंत विकसित भारत हा दृष्टिकोन पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचे आहेत. इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशामधील अधिक तरूण विचारवंत सोल्यूशन्स सादर करत असताना भारत संकल्पनांमध्ये अग्रस्थानी असण्यास अद्वितीयरित्या स्थित आहे, जे स्थानिक आव्हानांचे निराकरण करतात आणि जागतिक परिवर्तनाला प्रेरित करतात. सॅमसंगच्या सॉल्व्ह फॉर टूमारो सारखे उपक्रम तरूणांसाठी त्यांच्या संकल्पनांना जागतिक भल्याकरिता सोल्यूशन्समध्ये बदलण्यासाठी, तसेच तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वसमावेशक व शाश्वत प्रगतीला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण प्लॅटफॉर्म आहे. भारतातील यूएनला अशा सहयोगांना विशेषत: खाजगी क्षेत्राला पाठिंबा देण्याचा अभिमान वाटतो, जे तरूण नेतृत्व, इनोव्हेशन व कृतीला चालना देते, ज्यामधून कोणीही मागे न राहण्याची खात्री मिळते,” असे भारतातील युनायटेड नेशन्स रेसिडण्ट कोऑर्डिनेटर शॉम्बी शार्प म्हणाले.
“तरूण व्यक्ती आजच्या नितांत जागतिक आव्हानांचे निराकरण करण्यासाठी महत्त्वाचे आहेत. सॉल्व्ह फॉर टूमारो २०२५ सारखे उपक्रम त्यांना त्यांच्या संकल्पनांना तंत्रज्ञानाचा वापर करत प्रत्यक्षात आणण्यास सक्षम करतात. आम्हाला आनंद होत की, हे सोल्यूशन्स समुदायांमध्ये वास्तविक परिवर्तनाला चालना देण्यासाठी तरूण-केंद्रित संकल्पनांना वाढवण्यास मदत करत आहेत,” असे इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे (एमईआयटीवाय) अतिरिक्त सचिव अभिषेक सिंग म्हणाले.
सॅमसंग इंडियाच्या फ्लॅगशिप कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) उपक्रमाच्या चौथ्या एडिशनचा हजारो सहभागींना सामावून घेण्याचा, तसेच डिझाइन थिंकिंग, प्रत्यक्ष प्रोटोटाइपिंग, गो-टू-मार्केट स्ट्रॅटेजीज व बिझनेस प्लॅनिंगमध्ये ८२,००० हून अधिक तासांचे व्यापक प्रशिक्षण देण्याचा मनसुबा आहे. अंतिम टप्प्यामध्ये फायनालिस्ट्स म्हणून निवडण्यात येणाऱ्या टीम्सना सॅमसंग, आयआयटी दिल्ली आणि उद्योग व्यावसायिकांकडून देण्यात येणाऱ्या विशेषीकृत प्रशिक्षण व मार्गदर्शनामधून फायदा होईल.
मंगळवारी सर्व भागीदारांच्या उपस्थितीत आयआयटी दिल्ली येथे ‘सॉल्व्ह फॉर टूमारो २०२५’चे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटनाप्रसंगी भारत सरकारच्या प्रमुख वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाच्या वरिष्ठ संचालक डॉ.सपना पोती, भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सायण्टिस्ट सी शार्दुल राव आणि एमईआयटीवाय स्टार्टअप हबचे सीईओ पी. एस. मदनगोपाळ उपस्थित होते.