Home मनोरंजन ‘वागले की दुनिया’ मध्ये सुगंधा मिश्रा ची एंट्री

‘वागले की दुनिया’ मध्ये सुगंधा मिश्रा ची एंट्री

3 second read
0
0
29

no images were found

‘वागले की दुनिया’ मध्ये सुगंधा मिश्रा ची एंट्री

 

सोनी सबवरील ‘वागले की दुनिया: नई पीढी नए किस्से’ ही मालिका मध्यमवर्गीय माणसाचा दैनंदिन संघर्ष आणि त्यांच्या कुटुंबातील हृदयस्पर्शी क्षण हलक्या-फुलक्या पद्धतीने मांडून प्रेक्षकांची आवडती मालिका बनली आहे. या लोभस विश्वात आता लोकप्रिय अभिनेत्री आणि कॉमेडीयन सुगंधा मिश्राची एंट्री होत आहे. ती या मालिकेत सुमन गढिया नामक एका विचित्र, अत्यंत नाटकी स्वभावाच्या स्त्रीच्या रूपात दिसणार आहे. नाटकीपणा आणि बनवाबनवी करणे तिच्या स्वभावात आहे. सुमन यामिनी (मानसी जोशी) सोबत एका नाटकात काम करत आहे आणि आपल्या एका आगामी नाटकात मध्यमवर्गीय स्त्री साकारण्यासाठी तशा स्त्रियांचे निरीक्षण करता यावे या हेतूने ती या सोसायटीमध्ये आली आहे. गोड गोड बोलून ती यामिनीला भुलवते आणि साई दर्शन सोसायटीत राहायला येते, पण प्रत्यक्षात तिचा उद्देश काही इतका सरळसोट नाही!

 

प्रेक्षकांना लवकरच एक धक्का बसणार आहे, कारण सुमन राजेशला (सुमित राघवन) सापळ्यात अडकवण्यासाठी एक युक्ती करते आणि मग त्याच्यावर अयोग्य वर्तन केल्याचा आरोप करते. हे ऐकून सगळ्यांना धक्काच बसतो, पण वंदना (परिवा प्रणती) आणि सखी (चिन्मयी साळवी) ठामपणे राजेशच्या पाठीशी उभ्या राहतात. त्यांना त्याच्या प्रामाणिकतेबद्दल आणि चारित्र्याबद्दल पूर्ण विश्वास आहे. तणाव वाढत जातो आणि वागले कुटुंबियांना हा प्रश्न सतावत राहतो की, सुमन इतक्या निर्दयतेने राजेशवर आरोप का करत आहे? लवकरच हे स्पष्ट होते की, तिच्या मनात बऱ्याच वर्षांपासून राजेशबद्दल ही अढी आहे आणि त्याचे कारण भूतकाळात लपलेले आहे. सुमन काय लपवत आहे? आणि ती राजेशची बदनामी का करत आहे? हे रहस्य जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष मालिकाच बघितली पाहिजे.

 

सुमनची भूमिका करणारी सुगंधा मिश्रा म्हणते, “सुमन या व्यक्तिरेखेच्या मी तात्काळ प्रेमात पडले. ती विचित्र आहे, तिरसट आहे आणि तिच्यात खूप वेगवेगळ्या छटा आहेत. ही अशी भूमिका आहे, जी करत असताना तुम्हाला स्वतःलाही सतत आश्चर्याचा धक्का मिळतो आणि गंमत वाटते. माझ्यात पहिल्यापासून एक नाटकी स्त्री दडलेली आहे. त्यामुळे सुमनची भूमिका करणे मला सोपे गेले. यात आव्हानात्मक आणि त्याचबरोबर एक रोमांचक गोष्ट ही होती की, मला पहिल्यांदाच काही उत्कट आणि भावुक दृश्ये करण्याची संधी मिळाली. भारती आचरेकर या जेष्ठ अभिनेत्रीसोबत काम करताना दडपण वाटले आणि प्रेरणाही मिळाली. सगळ्या टीमने मला लगेच आपलेसे करून घेतले. या संपूर्ण प्रवासात मला त्यांनी साथ दिली, प्रोत्साहन दिले आणि आपुलकी दिली.”

 

राजेश वागलेची भूमिका करणारा सुमित राघवन म्हणतो, “राजेश एक असा माणूस आहे, जो कुणी त्याच्याकडे बघत नसताना देखील सदाचरण करतो. त्यामुळे त्याच्यावर इतका गंभीर आरोप लागणे ही मोठी बाब आहे. त्यामुळे त्याच्या आणि त्याच्या कुटुंबियांच्या मनात भावनिक कल्लोळ माजतो. पण हे कथानक खूप छान पद्धतीने हाताळले आहे आणि केवळ कुटुंबातील अस्वस्थताच नाही तर त्यांच्या नात्याची आणि सत्याची ताकदही दाखवली आहे. सुगंधा सोबत काम करताना खूपच मजा आली. तिच्यामुळे सेटवर ऊर्जेचा जणू एक स्फोट झाला आणि खरी सुमन त्यातच दिसली! पडद्याच्या मागे आम्ही खूप धमाल केली, पण जेव्हा भावनिक दृश्ये करण्याची वेळ आली, तेव्हाही तिने खूप छान साथ दिली.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…