Home शैक्षणिक भारतीय ज्ञान प्रणाली विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविणे महत्वाचे : प्र-कुलगुरू प्रा.डॉ.पी.एस.पाटील

भारतीय ज्ञान प्रणाली विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविणे महत्वाचे : प्र-कुलगुरू प्रा.डॉ.पी.एस.पाटील

16 second read
0
0
51

no images were found

भारतीय ज्ञान प्रणाली विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविणे महत्वाचे : प्र-कुलगुरू प्रा.डॉ.पी.एस.पाटील

 

कोल्हापूर( प्रतिनिधी): राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये भारतीय ज्ञान प्रणालीचा समावेश केला असल्याने ती विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा.डॉ.पी.एस.पाटील यांनी केले.
            शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाइन शिक्षण केंद्राच्या मार्फत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व संलग्नित महाविद्यालयातील कला, वाणिज्य व शास्त्र विद्याशाखांसाठी भारतीय ज्ञान प्रणाली याबाबत राजर्षी शाहू सिनेट सभागृह येथे आयोजित केलेल्या एकदिवसीय कार्यशाळेत उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी मानव्यशास्त्र विद्याशाखा अधिष्ठाता प्रा.डॉ.एम.एस.देशमुख,विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता प्रा.डॉ.श्रीमती एस.एच ठकार, दूरशिक्षण व ऑनलाइन शिक्षण केंद्राचे संचालक डॉ. के. बी.पाटील, उपकुलसचिव श्री.व्ही.बी.शिंदे, सहा.प्राध्यापक, समन्वयक तसेच विविध महाविद्यालयातील शिक्षक उपस्थित होते.
           प्र-कुलगुरू प्रा.डॉ.पाटील म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- 2020 हे देशाच्या शैक्षणिक क्षेत्रात बहुआयामी बदल घडवून आणणारे आहे. त्यामुळे या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी शिक्षकांना प्रशिक्षण देवून भारतीय ज्ञान प्रणाली या अभ्यासक्रमात शिक्षक तज्ञ बनविणे गरजेचे आहे.शिक्षकांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- 2020 चा अंगीकार करून विद्यार्थी,समाज व देशाला दिशा देण्याचे कार्य केले पाहिजे. भारतीय ज्ञान प्रणाली या अभ्यासक्रमाची पद्धत शिक्षकांनी समजून घेतली पाहिजे.विद्यार्थ्याच्या ज्ञानाच्या क्षमता वाढविण्यासाठी भारतीय ज्ञान प्रणाली त्यांच्या पर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे.भारतीय तत्वज्ञान व संस्कृती याचा याचा अभ्यास भारतीय विद्यार्थ्यांनी केला पाहिजे.तसेच भारतीय सण यामध्ये सांस्कृतिकता आहे.त्या पाठीमागील तत्वज्ञान व विज्ञान माहित करून घेतले पाहिजे. असे प्र-कुलगुरू प्रा.डॉ.पाटील यांनी सांगितले.
यावेळी संचालक डॉ.के.बी.पाटील यांनी ‘भारतीय ज्ञान प्रणाली’,फलटण येथील मुधोजी कॉलेज मधील तत्त्वज्ञान विभागाचे विभाग प्रमुख प्रा.डॉ.एन.के.रासकर यांनी कला व भारतीय ज्ञान प्रणाली’ याविषयावर तसेच पलूस येथील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एस.साळुंखे यांनी ‘वाणिज्य व भारतीय ज्ञान प्रणाली’ तर स्कुल ऑफ नानो सायन्स आणि टेक्नोलॉजी येथील सहा.प्राध्यापक डॉ.पी.जे.पाटील यांनी ‘विज्ञान व भारतीय ज्ञान प्रणाली’ याविषयावर मनोगते व्यक्त केली.
           यावेळी पाचगणी येथील बहाई अकादमीचे संचालक डॉ.एल.आझादी यांनी मुल्याधिष्टीत शैक्षणिक अभ्यासक्रमावर ऑनलाइन सादरीकरण करून माहिती दिली.
यावेळी स्वागत व प्रास्ताविक अधिष्ठाता प्रा.डॉ.एम.एस.देशमुख यांनी केले.सूत्रसंचालन सहा.प्राध्यापक डॉ.नितीन रणदिवे यांनी केले.तर डॉ.सचिन भोसले यांनी आभार मानले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

नशामुक्त महाराष्ट्र अभियान यशस्वी करण्यासाठी भाजप युवा मोर्चा सक्रीय योगदान देईल, भाजप युवा मोर्चाचे प्रदेेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांची ग्वाही

नशामुक्त महाराष्ट्र अभियान यशस्वी करण्यासाठी भाजप युवा मोर्चा सक्रीय योगदान देईल, भाजप युव…