Home राजकीय राहुल गांधी यांचे आरोप बिनबुडाचे-हेमंत पाटील

राहुल गांधी यांचे आरोप बिनबुडाचे-हेमंत पाटील

11 second read
0
0
22

no images were found

राहुल गांधी यांचे आरोप बिनबुडाचे-हेमंत पाटील

 

पुणे, : लोकशाहीचे मंदिर असलेल्या लोकसभेत विरोधी पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीने पुराव्या अभावी केलेले आरोप देशवासियांमंध्ये संभ्रम निर्माण करू शकतो.विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या निवडणुकी संदर्भात केलेले भाष्य देशातील पारदर्शक निवडणूक यंत्रणेवर संशय निर्माण करण्याचा प्रयत्न आहे,असे मत इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी व्यक्त केले.

     राहुल यांनी २०२४ मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप केले.एका वृत्तपत्रात लिहलेल्या लेखातून त्यांनी यासंदर्भात कुठले पुरावे देखील दिलेले नाही. एकतर्फी निवडणूक आयुक्तांची निवड, बनावट मतदार, बनावट मतदान, टार्गेट बूथ रिंगिंग आणि सीसीटीव्ही पुरावे निवडणुकीत लपवण्यात आल्याचे नेहमीचेच राजकीय आरोप विरोधी पक्ष नेत्याने केले आहेत.परंतु, केवळ केंद्रातील नरेंद्र मोदी आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकार विरोधात संभ्रम निर्माण करण्यासाठी तसेच राज्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय षडयंत्रातून त्यांनी हॆ आरोप केल्याचे पाटील म्हणाले.

     महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर अचानक मतदानाची टक्केवारी ७.८३ टक्क्यांनी वाढली,असा दावा गांधी यांनी केला.मात्र,कुठल्याही राज्यात निवडणुका झाल्या तरी मतदानाची अंतिम टक्केवारी येण्यास वेळ लागतोच.शेवटच्या मतदाराचे मतदान होईस्तव कुठलीही आकडेवारी अंतिम मानता येत नाही.अशात मतदानाची टक्केवारी अचानक वाढते कशी? हा गांधी यांचा सवाल फोल ठरत असल्याचे पाटील म्हणाले.

     जवळपास ७६ लाख बोगस मतदान झाल्याचा दावा, राहुल यांनी केला आहे. मात्र, एवढ्या मोठ्या संख्येत बोगस मतदान महाराष्ट्रात झाले, असा आरोप कुठल्याही पुराव्या निशी करणे म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राचा अपमान आहे, अश्या शब्दात पाटील यांनी गांधी यांच्या आरोपांचा समाचार घेतला.महाराष्ट्रातील जनता लोकशाही आणि संविधानाला मानणारी आहे. राज्यातील प्रशासन यंत्रणा त्याचे प्रतीक आहे. परंतु, महाराष्ट्रासंदर्भात संभ्रम आणि अविश्वास निर्माण करण्याचे काम राहूल यांनी केले आहे. त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी पाटील यांनी यनिमित्त केली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…