Home राजकीय मराठा समाजातील विद्यार्थांची परदेशी शिक्षणासाठीची शिष्यवृत्ती सारथीच्या माध्यमातून तातडीने जमा करावी :  विजय जाधव यांचे फडणवीस यांना निवेदन

मराठा समाजातील विद्यार्थांची परदेशी शिक्षणासाठीची शिष्यवृत्ती सारथीच्या माध्यमातून तातडीने जमा करावी :  विजय जाधव यांचे फडणवीस यांना निवेदन

2 second read
0
0
39

no images were found

मराठा समाजातील विद्यार्थांची परदेशी शिक्षणासाठीची शिष्यवृत्ती सारथीच्या माध्यमातून तातडीने जमा करावी :  विजय जाधव यांचे फडणवीस यांना निवेदन

कोल्हापूर : मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न पूर्ण व्हावे ही महाराष्ट्र राज्य सरकारची पहिल्यापासूनच सकारात्मक भू‌मीका आहे. सारथी या संस्थेकडून मराठा समाजातील गरीब कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी, परदेशातील नामांकित उच्च श्रेणीतील 200 शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते.
काल दि 30.09.2024 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले असता परदेशी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृती लवकरात लवकर जमा करण्यात यावी याबाबत उपमुख्यमंत्री महोदयांना कोल्हापूर विमानतळ याठिकाणी निवेदन सादर केले.
निवेदन स्विकारल्या नंतर तात्काळ उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांनी तातडीने सारथी संस्थेच्या वरिष्ठ अधिका-यांशी फोनद्वारे संवाद साधून यामधील पात्र विद्यार्थ्यांची यादी येत्या 02 दिवसात मंत्रालयात पोहोच करावी असे आदेश दिले.
त्याचप्र‌माणे भाजपाच्या वतीने गेल्या 10 दिवसांपासून सारथी संस्थेच्या अधिका-यांशी बोलून याबाबत जलदगतीने कार्यवाही व्हावी यासाठी प्रयत्न चालू होते व त्याचाच परिपाक म्हाणून सारथी संस्थेची पात्र विद्यार्थीची यादी आजच पूर्ण करून मुंबई मंत्रालयात पाठवत आहे असे सारथी संस्थेच्या अधिका-यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांना आश्वस्त केले.
यानिमित्ताने पुन्हा एकदा मा.उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे विशेष अभिनान करीत आहोत कारण 2015 सालापासून मराठा समाजातील असंख्य गोरगरीब कुटुंबातील अनेक तरुण सारथी, आण्णासाहेब पाटील महामंडळ यामाध्यमातून स्वत:च्या पायावर सक्षमपणे उभे राहात आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राष्ट्र प्रथम, त्यानंतर पक्ष आणि मग कार्यकर्ता या विचारधारेवर भाजपची वाटचाल, कराडमध्ये झाली भाजपा संघटन पर्व अंतर्गत बैठक

राष्ट्र प्रथम, त्यानंतर पक्ष आणि मग कार्यकर्ता या विचारधारेवर भाजपची वाटचाल, कराडमध्ये झाल…