
no images were found
माझे पात्र आयुष्यातील आव्हानांना सहज तोंड देते- लोकश बत्ता
सोनी सबवरील बादल पे पांव है मालिकेत बानी (अमनदीप सिधू) या महत्त्वाकांक्षी मध्यमवर्गीय मुलीचे कथानक असून ती स्वत: व तिच्या कुटुंबासाठी तिने मोठे स्वप्न पाहिले आहे. आकाळाएवढी स्पप्न पाहून बानीने रजत (आकाश अहुजा) शी लग्न केले. पण रजतचे कुटुंब फार महत्त्वाकांक्षी नाही, हे कळाल्यावर तिची स्वप्न धुळीस मिसळतात.
रजतच्या कुटुंबातील एक जण गौरव, ज्याची भूमिका लोकेश बत्ता साकारत आहे. तो कुटुंबातील मोठा मुलगा असून रजतचा भाऊ आहे. एका चर्चेदरम्यान, लोकेशने त्याच्या गौरवच्या पात्रावर प्रकाश टाकला. या भूमिकेकडे तो कसा आककर्षित झाला, हे बहुरंगी पात्र साकारताना आलेली आव्हाने रवी आणि सरग प्रॉडक्शनसोबत दुसऱ्यांदा काम करण्याचा अनुभव त्याने सांगितला.
बादल पे पांव है..या मालिकेतील पात्राबद्दल काही सांग.. पात्राकडे कसा आकर्षित झाला?
गौरवच्या पात्रातील विनोद आणि भावनिकता पाहून त्याकडे ताबडतोब आकर्षित झालो. अगदी सहजपणे हे पात्र आयुष्यातील आव्हानांचा सामना करते. तसेच त्याला अनेक भावनिक पदरही आहेत. या दोन्ही गोष्टींमुळे हे बहुआयामी पात्र साकारण्याची संधी मला मिळाली, असे मला वाटते. अशा प्रकारची अष्टपैलू पात्र सापडणे दुर्मिळ असते. गौरवचे पात्र साकारणे हा माझ्यासाठी रोमांचक आणि समृद्ध करणारा अनुभव होता.
बानी ही एक महत्त्वाकांक्षी मुलगी असूनही मालिकेत तिला स्वार्थी म्हटले गेले. मालिकेच्या अनुषंगाने तुझे यावर काय मत आहे?
बादल पे पांव है या मालिकेचे कथानक एका तरुणीभोवती केंद्रित आहे. ती अत्यंत महत्त्वाकांक्षी असून तिला तिची स्वप्ने पूर्ण करायची आहेत. अशसा प्रकारच्या कथा विशेषत: तरुणींसाठी निश्चित सक्षम करणाऱ्या तसेच प्रेरणादायी ठरू शकतात. बानी ही स्वार्थी नाही. कितीही अडथळे आले तरी मोठ्या गोष्टी मिळवण्याची तिची महत्त्वाकांक्षा आहे. या नरेटिव्हमुळेच आयुष्यातील आव्हानांना तोंड द्यावे आणि महिलांना नकारात्मक लेबल लावण्याऐवजी त्यांच्या ध्येयांना समर्थन द्यावे, असे प्रेक्षकांचे मत होते..
गौरव खन्नाचे पात्र साकारताना तुला काही आव्हानात्मक वाटले? या भूमिकेसाठी तू कशी तयारी केली?
गौरवचे सखोल आणि गुंतागुंतीचे पात्र हे प्रमुख आव्हानांपैकी एक होते. त्याची महत्त्वाकांक्षा आणि दृढनिश्चय प्रामुख्याने साकारण्यासाठी मला त्याची पार्श्वभूमी, त्याचे आदर्श आणि भावनिक संघर्षाचा अभ्यास करावा लागला. माझी भूमिका आणि प्रतिसाद खरा वाटण्यासाठी मी गौरवचे इतर पात्रांशी असलेले संबंध अभ्यासण्यासाठी खूप वेळ घेतला. गौरवच्या व्यक्तिमत्त्वातील बारकावे साकारण्यासाठी आणि प्रेक्षकांशी एक नाते तयार करण्यासाठी हे आर्त पात्र समजून घेणे महत्त्वाचे होते.
रवी आणि सरगन प्रॉडक्शनसोबतची ही तुझी दुसरी मालिका आहे. बादल पे पांव है मालिकेच्या शूटिंगचा अनुभव कसा होता?
रवी आणि सरगन हे अप्रतिम प्रोड्युसर्स आहेत. त्यांच्यासोबत काम करणे ही खूप मोठी गोष्ट आहे. ते नेहमी क्रिएटिव्हिटीला प्रोत्साहन देतात आणि माझ्या कामाचे कौतुकही करतात. अनेकदा थेट मला सांगायला येतात, हे खरोखरच प्रेरणादायी आहे. त्यांच्या या सहाकार्यच्या वातावरणामुळे मला नेहमीच सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स देणे सोपे जाते. ”भाई वो सीन तो बहोत अच्छा किया तूने..” यासारखी त्यांची प्रतिक्रिया माझा आत्मविश्वास वाढवणारी ठरते..
पंजाबमधील पार्श्वभूमी वापरल्यामुळे एक खरेपणा आणि रीचनेस या मालिकेला आलाय, असे तुला वाटते का? तेथे काम करण्याचा अनुभव कसा होता?
पंजाबमध्ये शूटिंग करण्याचा अनुभव मला माझ्या घरी परत जाण्यासारखा होता. मी पंजाबचाच असल्याने काम आणि वैयक्तिक आयुष्य असे दोन्ही छान साधता आले. या राज्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि सुंदर वातावरण यामुळे मालिकेत अधिक खरेपणा दिसून येतो. ओळखीच्या ठिकाणी शूटिंगमुळे मी या पात्राशी आणि कथेशी अधिक जोडला गेलो. त्यामुळे ही सगळी प्रक्रिया नैसर्गिक आणि मनातून झाली…
पडद्यामागील अशी काही गोष्ट आहे का, जी तुला शेअर करावी वाटते?
I माझ्या सह कलाकारांसोबत माझे फार लवकर नाते तयार झाले. आम्ही सेटवर आणि बाहेर अशा दोन्ही ठिकाणी एकमेकांना सपोर्ट करतो. यामुळे एक उबदार वातावरण तयार होते. आम्ही अनेकदा शुटींगदरम्यान, एकमेकांना चिडवतो. सीन पूर्ण करण्यासाठी अनेकदा डायरेक्टर्सना आम्हाला लक्ष द्यायला सांगावे लागते.
मला आठवतं, एकदा बानीला तिच्या कुटुंबासाठी पहिल्यांदाच स्वयंपाक करायचा असतो. सेटवर खूप पदार्थ आणले होते. ते झटकन् गायबही झाले. माझ्या गौरवसारख्या पात्राप्रमाणे मलाही खायला खूप आवडते. मी खूप भूकही लागते. त्यामुळे स्वाभाविकच, सगळ्या कलाकारांनी मला दोष देत माझी थट्टा केली..