Home मनोरंजन अर्जुन बिजलानी म्हणतो की त्याची 20 वर्षांची कारकिर्द ही केवळ त्याच्या चाहत्यांमुळे आहे!

अर्जुन बिजलानी म्हणतो की त्याची 20 वर्षांची कारकिर्द ही केवळ त्याच्या चाहत्यांमुळे आहे!

13 second read
0
0
39

no images were found

अर्जुन बिजलानी म्हणतो की त्याची 20 वर्षांची कारकिर्द ही केवळ त्याच्या चाहत्यांमुळे आहे!

 

 

झी टीव्हीवरील ‘प्यार का पहला अध्याय शिवशक्ती’ने आपले कथानक आणि शिव (अर्जुन बिजलानी) आणि शक्ती (निक्की शर्मा) यांच्यातील अद्‌भुत केमिस्ट्रीसह प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. अर्जुन बिजलानी टेलिव्हिजन उद्योगामध्ये 20 वर्षे पूर्ण केली असून त्याने आपल्या सोशल मीडिया पेजवर आपला एक उत्तम अनुभव सांगितला, ज्यात त्याने गुजरातहून खास त्याला भेटायला मुंबईच्या फिल्मसिटीमध्ये त्याच्या मालिकेच्या चित्रीकरणाच्या सेटवर आलेल्या त्याच्या चाहत्यांबद्दल सांगितले.

उद्योगामध्ये 20 वर्षे पूर्ण केलेल्या अर्जुन बिजलानीने सातत्यपूर्ण पद्धतीने आपली कला अनेक उत्तम परफॉर्मन्सेसच्या माध्यमातून सिद्ध केली आहे. सध्या डॉ.शिवच्या व्यक्तिरेखेतही तो आपली हरहुन्नरी कला आणि विभिन्न भावना सादर करत आहे. प्रेमभंगामुळे गंभीर बनलेला शिव, लहान मुलाच्या रूपातील शिव, रागाने व्यथित झालेला शिव आणि आता एक प्रेम पती आणि पिता अशा अनेक रूपांमध्ये अर्जुन दिसून आला आहे. ह्या प्रवासामध्ये त्याला मिळालेले प्रेक्षकांचे प्रेम आणि समर्थन उल्लेखनीय आहे. हल्लीच काही भाग्यवान चाहत्यांना अर्जुनला भेटण्याची संधी मिळाली. आपल्या यशामध्ये आपल्या चाहत्यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे मत असलेल्या अर्जुनने त्यांचे अतिशय प्रेमाने आपल्या सेटवर स्वागत केले, त्यांच्याशी गप्पा मारल्या, त्यांच्यासोबत फोटो काढले आणि सर्वांसाठी हा अनुभव अविस्मरणीय बनवला.

अर्जुन बिजलानी म्हणाला, मला माझ्या चाहत्यांना भेटायला अतिशय आवडते. त्यांच्यामुळे मला दररोज सकाळी उठून माझ्या चित्रीकरणाला जावेसे वाटते कारण मला त्यांचे मनोरंजन करायचे असते आणि त्यांचे आशीर्वाद मिळवायचे असतात. डॉ.शिवच्या रूपात मला मिळणारे प्रेम जबरदस्त आहे आणि माझे चाहते आनंदी आहेत आणि त्यांचे छान मनोरंजन होत आहे हे पाहून मलाही अतिशय आनंद मिळतो. मी आज जे काही आहे ते मला तुम्हीच बनवले आहे. गुजरात खास मला भेटायला माझे काही चाहते आमच्या सेटवर आले होते. ते अतिशय चांगले होते आणि त्यांना भेटून मला खूपच छान वाटले. जेव्हा तुमच्या कामाची दखल घेतली जाते आणि तुमचे कौतुक केले जाते तेव्हा अर्थातच तुम्हांला छान वाटते. अख्ख्या देशातील लोकांना तुमचे नाव ठाऊक असते तो क्षण अर्थातच एका कलाकारासाठी अतिशय अभिमानाचा असतो. माझ्या आयुष्यात असे प्रेमळ चाहते आहेत ह्या गोष्टीबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…