
no images were found
भाजपा जिल्हा कार्यालयात सावित्रीबाई फुले जयंती संपन्न
कोल्हापूर(प्रतिनिधी) :स्त्रियांसाठी साक्षरतेची वाट प्रकाशमान करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती भाजपा कोल्हापूर जिल्हा कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अपर्ण करण्यात आला. याप्रसंगी प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश कार्यकारणी सदस्य राहूल चिकोडे, महिला जिल्हाध्यक्षा रुपाराणी निकम, युवा जिल्हाध्यक्ष गिरीष साळोखे, शैलेश पाटील, विराज चिखलीकर, दिलीप मेत्राणी, मामा कोळवणकर, संगीता खाडे, माधुरी नकाते यांची प्रमुख उपस्थिती होती.
यानंतर भाजपा महिला मोर्चाच्यावतीने शहरामध्ये समाजसेवेचे कार्य करणाऱ्या कर्तुत्ववान महिलांचा सत्कार जिल्हाध्यक्षा रूपाराणी निकम यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये सई मुळीक ज्युदो खेळाडू, ऋतिका पाटील मेट कुस्ती खेळाडू, अर्पिता शेलार महानगरपालिका अग्निशमन विभाग फायरमन, शोभा राउत कादंबरी-लेखक, गीता हसूरकर पोलीस निर्भया पथक, रुपाली तोडकर गृहउद्योग, पूनम मोरे उद्योजिका, आरती चौगले सामाजिक कार्य, कविता नाईक जिल्हा कारागृह विभाग लिपिक, गीतांजली डोबे दीप फौंडेशन यांचा समावेश होता.
याप्रसंगी उपस्थित सर्व महिलांनी स्त्री शक्तीचा आवाज आणखी बुलंद करण्याचा संकल्प सोडत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले. तसेच महिलांसाठी लागू होण्याऱ्या सर्व केंद्रीय योजनांची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर सीपीआरच्या परिचारिका प्रार्थना शेलार यांनी उपस्थित महिलांना सावित्रीबाई फुले यांनी केलेले कार्य पद्धती व समाजाबद्दल असलेली त्यांची भावना यावर भाषण केले.
याप्रसंगी महिला मोर्चा अध्यक्षा रुपाराणी निकम यांनी, सावित्रीबाई फुले यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलेला संघर्ष हा कायम स्वरूपी महिला वर्गासाठी प्रेरणा देणारा असेल. तसेच आदरणीय मोदीजींच्या महिला सन्मान तसेच महिलांसाठी खूप साऱ्या योजना सुरु केल्या आहेत. त्यामुळे कोल्हापूर शहरातील बूथ स्तरीय कार्याच्या माध्यमातून प्रत्येक महिलेशी संपर्क साधून महिलांना महिलांच्या विविध योजनांचा जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. तेसच मोदीजींच्या माध्यमातून महिला सन्मान आणि महिला सक्षमीकरण या योष्टीवर भर देण्यात आला आहे त्यामुळे २०२४ मध्ये पुन्हा नरेंद्रजी मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी आपण सर्वांनी वज्रमुठ बांधली पाहिजे असे सांगितले. याप्रसंगी भाजपा प्रदेश समन्वयक रेश्मा शेख, तेजस्विनी पार्टे, कमल डेणगे, प्रणोती पाटील, अश्विनी भास्कर, शीतल तिरुके, शिवानी पाटील, अस्मिता खाडे, विद्या बनछोडे यांची उपस्थिती होती.