Home सामाजिक उद्योग विभाग व शिवाजी विद्यापीठाचा संयुक्त उपक्रम

उद्योग विभाग व शिवाजी विद्यापीठाचा संयुक्त उपक्रम

3 second read
0
0
33

no images were found

उद्योग विभाग व शिवाजी विद्यापीठाचा संयुक्त उपक्रम

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठात उद्या (दि. २ जानेवारी) सकाळी १०.३० वाजता ‘महा-६० कॉर्नेल एक्सिलरेटर प्रोग्राम’अंतर्गत एकदिवसीय ‘महा-६० डिस्ट्रिक्ट आऊटरिच’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाचा उद्योग विभाग, कॉर्नेल युनिव्हर्सिटी, न्यूयॉर्क (अमेरिका) आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त
विद्यमाने आयोजित हा कार्यक्रम तंत्रज्ञान अधिविभागाच्या सभागृहात होणार आहे. महाराष्ट्र शासनाचे विकास आयुक्त (उद्योग) दिपेंद्र सिंग कुशवाह (आयएएस) यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या या कार्यक्रमास कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांची प्रमुख उपस्थिती असेल.कार्यक्रमास प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह पुणे विभागाचे सहसंचालक (उद्योग) एस.जी. राजपूत, विद्यापीठाच्या इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड लिंकेजिसचे संचालक डॉ. महादेव देशमुख आणि जिल्हा उद्योग केंद्राचे सरव्यवस्थापक अजयकुमार पाटील यांची उपस्थिती असणार आहे.
महाराष्ट्राच्या नवीन औद्योगिक धोरण-२०१९ अंतर्गत नवउद्योजक आणि नाविन्यपूर्ण स्टार्टअप्सना आवश्यक पायाभूत सुविधा प्रदान करून नवउद्योजकांना पूरक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने ६ मार्च २०२०च्या शासन निर्णयाद्वारे राज्यात बिझनेस एक्सिलरेटर/ इनक्युबेशन सेंटर स्थापन करण्याकरिता कॉर्नेल विद्यापीठ, इथाका, न्यूयॉर्क व त्यांचे आशियाई भागीदार एक्स.ई.डी. यांच्यासमवेत सामंजस्य करार करण्यात आला. उद्योजकांना व्यवसाय वाढीसाठी आवश्यक कौशल्ये व प्रशिक्षणासह सुसज्ज करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कॉर्नेल विद्यापीठाच्या सहकार्याने महा-६० कार्यक्रम (बिझनेस एक्सिलरेटर प्रोग्राम) सुरू केला आणि त्यात दरवर्षी किमान ६० नवउद्योजकांना प्रशिक्षित केले जात आहे. याअंतर्गत पहिल्या बॅचमधील ७३ नवउद्योजकांनी यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केले आहे. या प्रशिक्षितांच्या सहकार्याने जिल्ह्यात उद्योजकतेची परिसंस्था निर्माण करण्यासाठी डिस्ट्रिक्ट आऊटरिच प्रोग्राम आयोजित करण्यात येत आहेत. या उपक्रमाचा उद्देश उदयोन्मुख उद्योजकांना सक्षम करणे आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय मानसिकता विकसित करणे हा आहे. हा कार्यक्रम शिक्षण, मार्गदर्शन आणि कौशल्य विकासावर केंद्रित असून उद्योजकांच्या पुढील पिढीला प्रेरणा व प्रोत्साहन देण्यासाठी उद्योग विभागाचा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरेल, असा विश्वास जिल्हा उद्योग केंद्राचे सरव्यवस्थापक अजितकुमार पाटील यांनी व्यक्त केला.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पोलिसांनी बनावट कीटकनाशकच्या रॅकेटचा पर्दाफाश केला; मुख्य आरोपीला अटक

पोलिसांनी बनावट कीटकनाशकच्या रॅकेटचा पर्दाफाश केला; मुख्य आरोपीला अटक      …