Home देश-विदेश तुमच्या ४१ अधिकाऱ्यांना माघारी बोलवा, नाहीतर…”, भारताचा कॅनडाला इशारा

तुमच्या ४१ अधिकाऱ्यांना माघारी बोलवा, नाहीतर…”, भारताचा कॅनडाला इशारा

0 second read
0
0
41

no images were found

तुमच्या ४१ अधिकाऱ्यांना माघारी बोलवा, नाहीतर…”, भारताचा कॅनडाला इशारा

गेल्या आठवड्याभरापासून खलिस्तान समर्थक हरदीप सिंग निज्जर हत्या प्रकरण चर्चेत आलं आहे. कॅनडामध्ये झालेल्या या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी थेट देशाच्या संसदेत केला होता. त्यावरून द्विपक्षीय संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. आत्तापर्यंत दोन्ही देशांनी एकमेकांच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याची हकालपट्टी केली होती. आता भारतानं कॅनडाला भारतातील त्यांच्या ४१ राजनैतिक अधिकाऱ्यांना माघारी बोलवण्यास सांगितलं आहे. फायनान्शियल टाईम्सच्या हवाल्याने इंडियन एक्स्प्रेसनं हे वृत्त दिलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
१८ जून रोजी कॅनडाच्या व्हँकोव्हरमध्ये हरदीप सिंग निज्जर याची दोन अज्ञात हल्लोखोरांनी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणाची कॅनडातील तपास यंत्रणा चौकशी करत असताना जस्टिन ट्रुडो यांनी दोन महिन्यांनंतर कॅनडाच्या संसदेत या प्रकरणात भारताचा सहभाग असल्याचा आरोप केला. भारतानं हे आरोप फेटाळले असताना कॅनडा मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहे. अमेरिका व ऑस्ट्रेलियानं भारतानं तपासात सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर भारत व कॅनडामधील संबंध ताणले गेले आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In देश-विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

टाटा पॉवरने राज्यभरात हरित ऊर्जा परिवर्तनाची गती वाढवली

टाटा पॉवरने राज्यभरात हरित ऊर्जा परिवर्तनाची गती वाढवली     महाराष्ट्र:  सा…