
no images were found
विक्रम पावसकर यांचे नाव जाणीवपूर्वक गोवल्यास सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरेल – सकल हिंदू समाजाचे निवेदन
कोल्हापूर – पुसेसावळी (जिल्हा सातारा) येथे ११ सप्टेंबरच्या रात्री झालेल्या हिंसाचारात सातारा येथील हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाप्रमुख श्री. विक्रम पावसकर यांचे नाव समाजकंटकांकडून अकारण गोवले जात आहे. या प्रकरणी जर पोलीस प्रशासन हिंदूंना आणि हिंदू समाजाच्या प्रतिनिधींना प्रताडित करत असेल, तर महाराष्ट्रातील सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरून या विषयावर आंदोलन करेल, असे निवेदन कोल्हापूर जिल्हाधिकारी यांना सकल हिंदू समाजाच्या वतीने देण्यात आले. हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी स्वीकारले.
या प्रसंगी या प्रसंगी हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, हिंदु महासभेचे जिल्हाप्रमुख श्री. मनोहर सोरप, श्री. नंदकुमार घोरपडे, श्री. राजू तोरस्कर, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक श्री. पराग फडणीस, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव, कोल्हापूर शहर कार्यवाह श्री. आशिष लोखंडे, हिंदू युवा प्रतिष्ठानचे श्री. अशोक देसाई, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी आणि श्री.मधुकर नाझरे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्री. विक्रम पावसकर हे नेहमीच हिंदू समाजाच्या मागे ठाम उभे असतात आणि हा काही गुन्हा नाही. सातारा येथे घडलेली घटना ही दुर्दैवी आहे; पण कसलेही पुरावे नसताना केवळ बिनबुडाचे आरोप करुन श्री. विक्रमजी पावसकर यांना विनाकारण बदनाम केले जात आहे आणि या घटनेचा फायदा घेऊन हिंदू मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
गेले कित्येक महिने हिंदू देव-देवता आणि महापुरूषांचा अपमान करणारे स्टेटस आणि पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहेत. या विरुध्द पोलिसात तक्रार करुनही काही कारवाई केली जात नाही, टाळाटाळ केली जाते आणि कारवाई केलीच तर किरकोळ स्वरूपाची केली जाते. यामुळे समाजकंटक गुन्हेगार अधिकच निर्ढावले आहेत. या लोकांना पोलिसांची तसेच कायद्याची भितीच उरलेली नाही. त्यामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत. परिणामी समाजात हिंदूंच्या भावना दुखावल्या जातात. पोलीस प्रशासनाकडून कठोर कारवाई न झाल्यामुळेच हिंसाचार होत आहेत. या निवेदनाद्वारे आम्ही आपणास सूचित करत आहोत की अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा आपण आतंकवादाच्या दृष्टिकोनातून तपास करावा आणि त्याच अनुषंगाने गुन्हे दाखल करावे. तसेच अशा आतंकवाद्यांच्या संपत्ती जप्त करून त्यांची घरे जमीनदोस्त करावी. त्यानंतरच अशा गुन्ह्यांना आळा बसेल असे आम्हाला वाटते. अशा प्रकारची कारवाई भारतामध्ये उत्तर प्रदेश या राज्यात होत आहे. परंतु दुर्दैवाने आपण एकाच देशात आणि एकाच संविधानाचे पालन करत असूनही महाराष्ट्रात अशा प्रकारची कारवाई केली जात नाही. यास पूर्णपणे पोलीस प्रशासन जबाबदार आहे असे आमचे ठामपणे मत आहे.
जिहादी मानसिकतेच्या आतंकवाद्यांच्यावर कारवाई न करता जर पोलीस प्रशासन हिंदूंना आणि हिंदू समाजाच्या प्रतिनिधींना प्रताडित करत असेल तर महाराष्ट्रातील सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरून या विषयावर आंदोलन करेल. सकल हिंदू समाज श्री. विक्रमजी पावसकर यांच्या मागे खंबीरपणे उभा आहे.