no images were found
शेतकऱ्यांसाठी पॅकेज अथवा मदत आज ठरणार
मुंबई : अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करणार की मदतीबाबत सरकार वेगळा निर्णय घेणार हे आजच्या अधिवेशनात ठरेल. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस महत्वपूर्ण आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच विरोधकांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. तसेच राज्यभरातील शेतकऱ्याकडून दिलासा देण्याची मागणी होत आहे. याबाबत सरकार आज निवेदन सादर करणार असल्याचं सभागृहात सरकारकडून सांगण्यात आले आहे.