Home मनोरंजन ‘रब से है दुआ’ने 100 भागांच्या प्रसारणाचा टप्पा पार केल्यामुळे अदिती शर्मा आणि करणवीर शर्मा यांनी व्यक्त केली कृतज्ञता!

‘रब से है दुआ’ने 100 भागांच्या प्रसारणाचा टप्पा पार केल्यामुळे अदिती शर्मा आणि करणवीर शर्मा यांनी व्यक्त केली कृतज्ञता!

6 second read
0
0
206

no images were found

‘रब से है दुआ’ने 100 भागांच्या प्रसारणाचा टप्पा पार केल्यामुळे अदिती शर्मा आणि करणवीर शर्मा यांनी व्यक्त केली कृतज्ञता!

‘झी टीव्ही’वरील ‘रब से है दुआ’ या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली असून प्रसारणास प्रारंभ झाल्यापासूनच त्यातील व्यक्तिरेखांना प्रेक्षकांचा उदंड पाठिंबा आणि प्रेम मिळत आहे. हैदर (करणवीर शर्मा) आणि आपल्यात काहीतरी प्रेमप्रकरण सुरू असल्याचे भासवून गझल (रिचा राठोड) आपला प्रियकर रूहानवर (अंकित रायझादा) दबाव टाकण्याचा प्रयत्न कसा करते, ते अलीकडच्या काही भागांत प्रेक्षकांनी पाहिले. किंबहुना कसेही करून मी तुझा पती हैदरशी लग्न करीनच, असे आव्हानच गझलने दुआला (अदिती शर्मा) दिलेले असते. पण गझलचे खरे स्वरूप सर्व कुटुंबियांसमोर उघड करून ती रूहानला तिच्याशी लग्न करण्यापासून कसे वाचवते, ते पाहणे नक्कीच रंजक ठरेल.

प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी या मालिकेचे सर्व कलाकार आणि कर्मचारी रात्रंदिवस कामात व्यग्र असून या मालिकेने नुकताच 100 भाग प्रसारित करण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला. किंबहुना या मालिकेच्या प्रेक्षकांनी आणि चाहत्यांनी त्यानिमित्त या मालिकेच्या सेटवर केक, फुगे आणि पुष्पगुच्छ पाठवून आपले प्रेम व्यक्त केले. त्यावर मालिकेतील प्रमुख कलाकारांनी सामाजिक माध्यमांवरून प्रेक्षकांच्या या प्रेमाबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त केली.

अदिती शर्मा म्हणाली, “प्रेक्षक आणि चाहत्यांकडून आम्हाला जो उदंड प्रतिसाद लाभत आहे, त्यामुळे आम्ही सर्वजण भारावून गेलो असून ते पाहून आम्हाला खूपच आनंद झाला आहे. आमच्या मालिकेने 100 भाग प्रसारित केले आहेत, हे खरंच वाटत नाही. कारण आम्ही जणू काल-परवा चित्रीकरणाला प्रारंभ केला आहे, असंच आम्हाला वाटतं. या संपूर्ण वाटचालीत मालिकेतील सर्व कलाकार आणि कर्मचार्‍्यांनी आम्हाला खूप पाठिंबा दिला. सेटवर आम्ही सर्वजण जणू एका कुटुंबाचाच भाग असल्यासारखे राहतो. आम्ही यापुढेही प्रेक्षकांचं असंच मनोरंजन करत राहू आणि असेच महत्त्वाचे टप्पे पार करत राहू, अशी मी आशा बाळगते.”

करणवीर शर्मा म्हणाला, “मालिकेच्या प्रसारणाला प्रारंभ झाल्यापासूनच प्रेक्षकांनी आमच्यावर प्रेमाचा जो उदंड वर्षाव केला आहे, त्याबद्दल मी त्यांचे पुरेसे आभार मानूच शकत नाही. मालिकेने 100 भागांचं प्रसारण पूर्ण केल्याचा मला खूपच आनंद होत असून प्रेक्षकांकडून मिळणार्‍्या प्रेमामुळे मी भारावून गेलो आहे. आतापर्यंतची आमची वाटचाल खूपच सुरळीत झाली असून माझ्या व्यक्तिरेखेचे नवनवे पैलू उलगडून पाहण्यास आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास मी उत्सुक बनलो आहे. ही तर केवळ सुरुवात आहे आणि प्रेक्षकांचं प्रेम आम्हाला यापुढेही असंच मिळत राहील, अशी आशा आहे.”

मालिकेने 100 भाग प्रसारित केल्याबद्दल सर्वच जण खुश असले, तरी आगामी भागांमध्ये रूहानवर दबाव टाकून त्याच्याबरोबरचे लग्न रद्द करण्यासाठी गझल शर्थीचे प्रयत्न करताना दिसेल. पण त्यात तिला यश मिळेल का? की सर्व कुटुंबियांसमोर दुआ तिचे खरे स्वरूप उघड करून आपले लग्न सुरक्षित राखेल?

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जारण’च्या प्रमोशनल साँगने उडवला थरकाप

जारण’च्या प्रमोशनल साँगने उडवला थरकाप   मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेत असलेल…