Home शासकीय शिधापत्रिकाधारकांसाठी सरकारचा नवा नियम

शिधापत्रिकाधारकांसाठी सरकारचा नवा नियम

2 second read
0
0
200

no images were found

शिधापत्रिकाधारकांसाठी सरकारचा नवा नियम

तब्बल 15 कोटी शिधापत्रिकाधारकांना होणार लाभ

मुंबई :  रेशन कार्डधारकांसाठी एक महत्वाची बातमी. शिधापत्रिकाधारकांसाठी सरकार नवा नियम लागू करणार आहे. याचा लाभ तब्बल 15 कोटी शिधापत्रिकाधारकांना होणार आहे. सरकार  रेशन कार्डधारकांच्या हितासाठी वेळोवेळी पावले उचलत आहे. आता उत्तर प्रदेश सरकार सार्वजनिक रेशन वितरण व्यवस्थेत मोठा बदल करत आहे. उत्तर प्रदेशच्या योगी सरकारच्या तयारीनुसार, वर्ष 2023 च्या सुरुवातीपासून, यूपीतील सर्व जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक रेशन वितरण प्रणालीअंतर्गत, रेशन दुकानांमधून  पौष्टिक तांदूळ  उपलब्ध करुन दिला जाणार आहे. रेशन दुकानांवर मिळणारा हा तांदूळ 15 कोटी लोकांच्या फायद्यासाठी अत्यंत पौष्टिक असेल. त्यात पोषणासाठी आवश्यक लोह, फॉलिक अ‍ॅसिड आणि व्हिटॅमिन बी-12 असेल. सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत यूपीमध्ये सुमारे 80 हजार रेशन दुकाने आहेत. या दुकानांच्या माध्यमातून 3.59 कोटी शिधापत्रिकाधारकांच्या नातेवाईकांपर्यंत पौष्टिक तांदूळ पोहोचेल. यामुळे शिधापत्रिकाधारकांच्या सुमारे 15 कोटी कुटुंबांना कुपोषणापासून वाचविण्यात मदत होणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

वेदांतूच्या अत्यंत वैयक्तिक स्वरुपावर शिक्षण देण्याच्या पद्धतीचे यश आणि लक्षणीय टप्पा

  वेदांतूच्या अत्यंत वैयक्तिक स्वरुपावर शिक्षण देण्याच्या पद्धतीचे यश आणि लक्षणीय टप्…