
no images were found
वेगवान गाडीचे नियंत्रण सुटल्यामुळे अपघात ; ८ ठार
केरळ : केरळ-तामिळनाडूच्या सीमेवर वेगात असलेल्या गाडीवरील नियंत्रण सूटल्याने अपघात घडला. या अपघातामध्ये ८ भाविक मृत्यूमुखी पडले असून दोन जखमींमध्ये एक लहान मुलाचा समावेश आहे. तमिळनाडूतील रहिवासी असलेले जवळ जवळ १० प्रवासी गाडीमध्ये होते. शबरीमला येथे दर्शन घेऊन हे भाविक परतत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. कुमिली-कंबम मार्गावर हा अपघात घडला असून अपघाताग्रस्त कार पाईपवर पलटी होऊन रस्त्यापासून सुमारे ४० फूट खोल खाली कोसळली. कारचा वेग अपघाताचे कारण असू शकतो असा पोलिसांनी अंदाज वर्तविला आहे.