लोकांचे जीवनमान बदलण्यासाठी संख्याशास्त्र महत्त्वाचे: डॉ. अभय बंग कोल्हापूर,(प्रतिनिधी): लोकांचे जीवनमान बदलण्यासाठी संख्याशास्त्र हे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. त्यामुळे संख्याशास्त्रज्ञांनी स्वतःच्या परीघाबाहेर जाऊन सामाजिक समस्यांचा शोध आणि वेध घेतला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंत डॉ. अभय बंग यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात आजपासून ‘अॅडव्हान्सेस इन स्टॅटिस्टिकल मेथड्स, डेटा सायन्स अँड ऑफिशियल स्टॅटिस्टिक्स’ …