शिवाजी विद्यापीठात आयोजित मराठी भाषाविषयक परिसंवादात बोलताना डॉ. दिलीप चव्हाण कोल्हापूर,(प्रतिनिधी): भाषेला सौष्ठव आणि श्रेष्ठत्व प्राप्त होण्यासाठी हजारो वर्षे जावी लागलेली असतात. काळानुरुप तिचे स्वरुप बदलत असते. भाषेचे वैभव टिकवून ठेवण्यासाठी तिला भाषिक राजकारणापासून जपण्याची आवश्यकता असते. त्यासाठी सातत्याने तिची मीमांसा, चिकित्सा केली पाहिजे, असा सूर शिवाजी विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात आज उमटला. विद्यापीठाचा मराठी अधिविभाग आणि महाराष्ट्र राज्य …