उपजीविकेला जीविकेची जोड दिल्यास जीवन समृद्ध: डॉ. विलास शिंदे कोल्हापूर (प्रतिनिधी): मानवाचे जीवन सुंदर होण्यासाठी उपजीविकेला जीविकेची जोड असणे महत्त्वाचे असते. या दोन बाबींचे संतुलन आयुष्य समृद्ध करते, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आज येथे केले. माझी शाळा, माझा फळा समूह आणि शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या वतीने आयोजित तिसऱ्या राज्यस्तरीय अक्षर संमेलनाचे उद्घाटक म्हणून …