भारतीय सैन्यदलाच्या सन्मानार्थ कोल्हापुरात शिवसेनेच्या वतीने तिरंगा पदयात्रा संपन्न… कोल्हापूर (प्रतिनिधी ):-गेल्या महिन्यात जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात निष्पाप भारतीयांचा मृत्यू झाला. याचा बदला म्हणून भारतीय सैन्य दलाने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय जवानांनी शौर्य गाजवत पाकिस्तानात घुसून पाकिस्तानला चारी मुंड्या चित केले. या शौर्याला सलाम करण्यासाठी आणि भारतीय सैन्य दलाचे मनोबल वाढवण्यासाठी शिवसेना …