‘निक्षय मित्र’ योजनेत राज्यात ‘कोल्हापूर ग्रामीण’ प्रथमक्षयरुग्णांच्या मदतीसाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे नागरिकांना आवाहन कोल्हापूर, : कोल्हापूरकरांच्या दातृत्वाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. पंतप्रधान क्षयमुक्त भारत अभियानांतर्गत ‘निक्षय मित्र’ होऊन क्षयरुग्णांना पोषण आहार किटची मदत देणाऱ्या अभियानामध्ये डिसेंबर २०२५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या राज्यस्तरीय अहवालानुसार २०१३ क्षयरुग्णांना पोषण आहार किट पुरवून ‘कोल्हापूर ग्रामीण’ प्रथम क्रमांकावर आला आहे. या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब …