0 second read
0
0
6

no images were found

भारताच्या पुढील इनोव्हेटर्सना ‘वंदे भारतम्’मध्ये मिळाले मोठे व्यासपीठ: 26,000 हून अधिक प्रवेशिकांमधून ‘वंदे भारतम्’ने निवडला आपला पहिला समूह

देशभरातील या उपक्रमामध्ये विविध क्षेत्रांतील होतकरू इनोव्हेटर्सना मार्गदर्शन, उद्योग क्षेत्राशी जोडले जाण्याच्या संधी आणि अनेक टप्प्यांतील मूल्यांकनासाठी एका व्यासपीठावर आणण्यात आले आहे.

अहमदाबाद, : अदाणी समूहाचे चेअरमन गौतम अदाणी यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या तळागाळातील नवोन्मेष आणि उद्योजकता उपक्रम ‘वंदे भारतम्’ने देशभरातून प्राप्त झालेल्या 26,000 हून अधिक अर्जांमधून आपल्या पहिल्या समूहाची निवड केली आहे.

‘वंदे भारतम्’ला देशातील प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये मोबिलिटी, शाश्वतता, तंत्रज्ञान, कृषी, संरक्षण, आरोग्यसेवा, उत्पादन, शिक्षण आणि इतर क्षेत्रांशी संबंधित कल्पनांचा समावेश आहे. या समूहात विविध क्षेत्रे, विषय आणि पार्श्वभूमीतून आलेल्या इनोव्हेटर्सचा समावेश आहे. देशातील समस्यांवर उपाय शोधणे, राष्ट्रनिर्माणात योगदान देणारे उद्योग उभारणे आणि देशभरात सकारात्मक परिणाम निर्माण करणे हा त्यांचा समान उद्देश आहे.

‘प्रतिभा सर्वत्र आहे, मात्र संधी सर्वत्र नसतात’ या विचारातून सुरू करण्यात आलेले ‘वंदे भारतम्’ होतकरू इनोव्हेटर्सना उत्कृष्ट मार्गदर्शक, उद्योग क्षेत्रातील नेते, ओळख आणि संधी यांच्याशी जोडण्याचे काम करते, जेणेकरून त्यांच्या कल्पनांचे अर्थपूर्ण उद्योगांमध्ये रूपांतर करता येईल. ज्या देशाने त्यांना स्वप्न पाहण्याची, काहीतरी निर्माण करण्याची आणि पुढे जाण्याची संधी दिली, त्या देशाला परतफेड करणे आवश्यक आहे आणि इतरांसाठीही अशाच संधींचे मार्ग तयार केले पाहिजेत, या श्री. अदाणी यांच्या ठाम विचारावर हा उपक्रम आधारित आहे.

पहिल्या समूहाच्या लॉन्चच्या प्रसंगी गौतम अदाणी म्हणाले, “जेव्हा मी या इनोव्हेटर्सकडे पाहतो, तेव्हा मला उद्याच्या भारताच्या शक्यता दिसतात. प्रतिभेला शहराची कोणतीही सीमा नसते आणि संधींनाही नसावी. येणाऱ्या वर्षांत जेव्हा आपण या पहिल्या समूहाकडे मागे वळून पाहू, तेव्हा यामध्ये भारताला बदलणारे उद्योग उभारणारे फाउंडर्स आणि इनोव्हेटर्स आपल्याला दिसतील, अशी मला आशा आहे. ही त्यांची सुरुवात आहे. आणि ‘वंदे भारतम्’चीही ही पहिली सुरुवात आहे.”

अनेक टप्प्यांच्या मूल्यांकन प्रक्रियेद्वारे निवडलेला पहिला समूह ‘वंदे भारतम् इमर्सिव्ह वीक’मध्ये सहभागी होईल. यामध्ये मार्गदर्शन सत्रे, व्यावसायिक नेते, उद्योजक आणि तज्ज्ञांशी संवाद तसेच अनेक टप्प्यांतील मूल्यांकनाचा समावेश असेल. हा कार्यक्रम 14 ऑगस्ट रोजी होणाऱ्या ‘वंदे भारतम् ग्रँड फायनाले’सह पूर्ण होईल. यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या इनोव्हेटर्सचा गौरव करण्यात येईल आणि त्यांना ‘वंदे भारतम् ट्रॉफी’ प्रदान करण्यात येईल.

‘वंदे भारतम्’ची निर्मिती केवळ एक स्पर्धा म्हणून करण्यात आलेली नाही. याचा दीर्घकालीन उद्देश असे राष्ट्रीय व्यासपीठ तयार करणे आहे, जे सुरुवातीच्या टप्प्यावरच कल्पनांची ओळख पटवू शकेल आणि भारतातील पारंपरिक उद्योजकता केंद्रांबाहेरील इनोव्हेटर्सना अशा व्यक्ती आणि संस्थांशी जोडू शकेल, ज्या त्यांच्या पुढील प्रवासाला गती देण्यासाठी मदत करू शकतील.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In निवड
Comments are closed.

Check Also

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशास १० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशास १० सप्टेंबर पर्यंत मु…