Home राजकीय बोगस मतदारांना चाप लावताना प्रामाणिक मतदारांचे नाव कटू देऊ नका: हेमंत पाटील

बोगस मतदारांना चाप लावताना प्रामाणिक मतदारांचे नाव कटू देऊ नका: हेमंत पाटील

0 second read
0
0
44

no images were found

बोगस मतदारांना चाप लावताना प्रामाणिक मतदारांचे नाव कटू देऊ नका: हेमंत पाटील

‘एसआयआर’ शतप्रतिशत यशस्वी करण्याचे आवाहन
पुणे,: राज्यात सध्या सुरू असलेल्या ‘एसआयआर’ अर्थात विशेष पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रियेच्या माध्यमातून बोगस मतदारांना चाप लावतांना प्रामाणिक मतदारांचे नाव मतदार यादीतून कटू देऊ नका, असे आवाहन भारत अगेन्स्ट करप्शन’चे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी निवडणूक आयोग तसेच सर्व राजकीय पक्षांना शनिवारी (ता.११) केले. एसआयआरच्या माध्यमातून मतदार यादीतील सर्व बनावट आणि बोगस मतदारांना तात्काळ वगळण्यात यावे, मात्र हे करत असताना एकाही प्रामाणिक आणि खऱ्या मतदाराचे नाव यादीतून कट होणार नाही याची कडक दक्षता प्रशासनाने घ्यावी, असे पाटील म्हणाले.

अनेक मतदारसंघांमध्ये एकाच मतदाराची नावे दोन किंवा अधिक ठिकाणी असल्याचे समोर येते. काही संशयास्पद मतदारसंघांमध्ये २ ते ४ टक्क्यांपर्यंत दुबार किंवा बोगस नावे असण्याची शक्यता असते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अशी बोगस आणि दुबार नावे शोधून ती तात्काळ वगळली पाहिजेत. बऱ्याचदा नाव किंवा पत्ता दुरुस्तीच्या नावाखाली प्रशासकीय हलगर्जीपणामुळे अनेक वर्षांपासून मतदान करणाऱ्या वैध मतदारांची नावे यादीतून गायब होतात. असे झाल्यास नागरिकांच्या मूलभूत हक्कावर गदा येईल. त्यामुळे नावांची अचूक खातरजमा करणे अनिवार्य आहे.

गेल्या काही निवडणुकांचा ट्रेंड पाहिला तर तांत्रिक चुकांमुळे किंवा स्थलांतराचा चुकीचा अंदाज लावल्यामुळे जवळपास १ ते १.५ टक्के खऱ्या आणि वैध मतदारांची नावे अनपेक्षितपणे वगळली गेल्याच्या तक्रारी आल्या असल्याचे पाटील म्हणाले. बूथ लेव्हल ऑफिसर्स (बीएलओ) हे या प्रक्रियेचा मुख्य कणा आहेत. त्यांनी केवळ कार्यालयात बसून कागदोपत्री काम न करता, प्रत्यक्ष जागेवर जाऊन प्रामाणिकपणे आणि निष्पक्षपातीपणे पडताळणी करावी. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता त्यांनी आपले कर्तव्य चोख बजावावे,असे आवाहन पाटील यांनी केले.

बनावट मतदार ही आपल्या लोकशाहीला लागलेली मोठी कीड आहे. ही कीड समूळ नष्ट करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक या सर्वच राजकीय पक्षांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र काम केले पाहिजे. जागृत नागरिक आणि सजग राजकीय प्रतिनिधीच एक पारदर्शक मतदार यादी तयार करू शकतात, जी निकोप लोकशाहीसाठी अत्यंत आवश्यक आहे, असे पाटील म्हणाले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय
Comments are closed.

Check Also

एनएसई क्रूड ऑईल ऑप्शन्समध्ये विक्रमी प्रीमियम उलाढाल, वॉल्यूम आणि ओपन इंटरेस्टची नोंद

एनएसई क्रूड ऑईल ऑप्शन्समध्ये विक्रमी प्रीमियम उलाढाल, वॉल्यूम आणि ओपन इंटरेस्टची नोंद मुंब…