Home Uncategorized स्वत:च्या पलीकडे जाऊन विचार करणारेच इतिहास घडवितात – शिवचरित्र अभ्यासक सुलभा सत्तुरवार

स्वत:च्या पलीकडे जाऊन विचार करणारेच इतिहास घडवितात – शिवचरित्र अभ्यासक सुलभा सत्तुरवार

2 second read
0
0
16

no images were found

स्वत:च्या पलीकडे जाऊन विचार करणारेच इतिहास घडवितात – शिवचरित्र अभ्यासक सुलभा सत्तुरवार
कोल्हापूर,(प्रतिनिधी):- ज्यावेळी माणूस स्वत:च्या पलीकडे जाऊन विचार करतो त्यावेळेस तो इतिहास घडवतो, असे प्रतिपादन पुणे येथील शिवचरित्र अभ्यासक श्रीमती सुलभा सत्तुरवार यांनी आज येथे केले.
विद्यापीठातीच्या वसतिगृहातील सर्व विद्यार्थी, विद्यार्थीनी, संशोधक विद्यार्थी आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘अष्टावधानी शिवराय’ या विषयावर व्याख्यान देताना प्रमुख वक्ते म्हणून शिवचरित्र अभ्यासक सुलभा सत्तुरवार बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरू डॉ.ज्योती जाधव होत्या.
पुढे बोलताना सुलभा सत्तुरवार म्हणाल्या, आजच्या काळामध्ये पालक आपल्या मुलांना कसे घडवायचे याबाबत सातत्याने विचार करताना दिसतात. 400 वर्षांपूर्वीचा जो काळ होता त्यावेळी परकीय सत्ता याठिकाणी होती. अशा कठीण काळामध्ये शिवाजी महाराजांच्या आई, वडीलांनी काय विचार केले असतील, हे समजून घेतले पाहिजे. अष्टपैलू व्यक्तिमत्व एका दिवसात तयार होत नाही. त्यासाठी प्रचंड कष्ट आणि त्याग करावा लागतो. शिवाजी महाराजांना घडविण्यामध्ये वडील शहाजीराजे आणि माता जिजाऊंचा वाटा अत्यंत मोलाचा आणि पायाभूत होतो. त्या काळामध्ये जमीन नागरणे म्हणजे अपशकून समजले जात होते. माता जिजाऊंनी बालशिवाजींच्या हस्ते जमीन नागरायला लावली, हे फार मोठे क्रांतीकारी पाऊल उचलले गेले, यामुळे जनतेमध्ये प्रचंड उभारी निर्माण झाली. जिजाऊमाता लोकांमध्ये जावून राहिल्याने रयतेचा त्यांनी विश्वास संपादीत केला. यासर्वं गोष्टींचा शिवाजी महाराजांवर फार मोठा परिणाम झाला. धर्मशास्त्र, युध्दशास्त्र, राज्य कारभार या सर्वांचे ज्ञान त्यांना देण्यात आले. नवनिर्मिती करावयाची असेल तर दुबळे राहून चालणार नाही, हे माता जिजाऊंनी ओळखले होते आणि त्या त्याच पध्दतीने शिवरायांना घडवित गेले. विजय प्राप्तीसाठी कर्मभूमीचा इतिहास आणि भूगोल याचे संपूर्ण माहिती असणे आवश्यक असते. यासाठी संपूर्ण परिसर बालशिवरायांनी ंपिंजून काढला. गरीब, श्रीमंत, जातीभेद हा भेद ठेवला नाही. हेच त्यांचे धोरण स्वराज्याच्या बळकटीसाठी अत्यंत महत्वाचे ठरले. प्रत्येक गोष्टीमध्ये सुक्ष्म नियोजन ते करीत होते. त्यामुळे त्यांची ताकद कमी असतानाही त्यांना यश मिळत गेले. जगावेगळे इतिहास घडवणारे शिवाजी महाराज वैयक्तिक सुख-दु:ख बाजुला ठेवले होते. रयतेचे नुकसान त्यांनी कधीही होवू दिला नाही. सर्व जनता त्यांना एकसमान होती. राजांनी प्रसंगी स्वत: जोखिम पत्करून शाहिस्तेखानावर हल्ला केला. ते इतिहासातील पहिले ‘सर्जिकल स्ट्राईक’ होते. दुष्काळामध्ये शेतकऱ्यांचा शेतसारा राजे माफ करीत होते. त्यांच्या काळामध्ये शेतकरी आणि रयत समाधानी राहिले होते. शिवाजी महाराजांच्या थोर पराक्रमाची शत्रुंना प्रचंड भिती होती. पन्नास वर्षांच्या आयुष्यामध्ये महाराजांनी अनेक गड आणि किल्ले उभे करून त्यांचे चोख व्यवस्था निर्माण करणारे जगातील एकमेव राजे होते. प्रत्येकाने आंतरीक मनाने चिंतन करून शिवविचार जागृत केले पाहिजे.
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक

कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक कोल्हापूर : …