Home राष्ट्रीय देशाची एकता आणि अखंडता टिकवण्यासाठी सीआरपीएफच्या जवानांनी केला सर्वोच्च त्याग

देशाची एकता आणि अखंडता टिकवण्यासाठी सीआरपीएफच्या जवानांनी केला सर्वोच्च त्याग

2 second read
0
0
30

no images were found

देशाची एकता आणि अखंडता टिकवण्यासाठी सीआरपीएफच्या जवानांनी केला सर्वोच्च त्याग

 

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री तसेच भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते अमित शहा यांनी सीआरपीएफच्या 86व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित परेडमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून 2,264 सुरक्षा कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाला श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी अमित शहा यांनी स्पष्टपणे सांगितले की, “सीआरपीएफ ची कोब्रा बटालियन येताना पाहून क्रूर नक्षलवाद्यांच्या सुद्धा थरकाप उडतो.” कोब्रा बटालियनच्या नेतृत्वाखाली सीआरपीएफच्या इतर जवानांनी नक्षलवाद संपवण्याच्या दिशेने भरीव  योगदान दिले आहे. हे विधान केवळ सैन्याने मिळविलेले यश दर्शवत नाही, तर देशवासीयांना विश्वास देत आहे की भारताची सुरक्षा एखाद्या पर्वतासारखी मजबूत आहे.

एक काळ होता जेव्हा पशुपतिनाथपासून तिरुपतीपर्यंतच्या जंगलात नक्षलवाद्यांची दहशत पसरलेली होती. नक्षलवादी चळवळी भारताचा बहुतांश प्रदेश अस्थिर करण्याचा प्रयत्न करत होत्या. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अचूक रणनीतीने आज या नक्षलवादाच्या ‘लाल संकटा’ला चांगलीच पाचर बसली असून आता ते फक्त चार जिल्ह्यांमध्ये कसेबसे जीव मुठीत घेऊन बसले आहे. नक्षलवादाला एक जखम मानणारे शहा यांनी कडक रणनीती आणि सीआरपीएफच्या बळावर ही भविष्यवाणी केली आहे की 31 मार्च 2026 पर्यंत नक्षलवाद भारतातून कायमचा संपेल.

गेल्या काही वर्षांत संपूर्ण जगाने पाहिलं आहे की मोदी-शहा या जोडीने देशाच्या अंतर्गत सुरक्षेला आणि सीमा सुरक्षेला एक नवं रूप दिलं आहे. एकीकडे कठोरपणे दहशतीला आळा घालणं, आणि दुसरीकडे विकासातून सामान्य जनतेच्या जीवनात स्थैर्य आणणे—हा समतोलच खऱ्या नेतृत्वाची ओळख असतो. अमित शहा यांची भूमिका नेहमीच स्पष्ट राहिली आहे—सुरक्षेच्या बाबतीत झिरो टॉलरन्स आणि नागरिकांसाठी विकासाचा मार्ग मोकळा करणे. आज भारत नक्षलवादाच्या त्या काळाला मागे टाकून पुढे गेला आहे, जेव्हा भीतीच शासन करत होती. आता शासनाचा आधार आहे विकास, लोकशाही आणि सुरक्षा.

देशाची एकता आणि अखंडता टिकवण्यासाठी सीआरपीएफच्या जवानांनी जे सर्वोच्च बलिदान दिलं आहे, ते भारतीय नागरिक कधीच विसरणार नाहीत. जिथे कधीकाळी पोलिससुद्धा जायला घाबरत होते, तिथे आज शाळा, दवाखाने आणि रस्ते बनत आहेत. ही ‘नव्या भारताची’ प्रतिमा आहे. ‘स्वच्छ भारत’, ‘हर घर तिरंगा’, ‘एक भारत श्रेष्ठ भारत’, ‘स्वच्छता ही सेवा’, ‘एक पेड माँ के नाम’ अशा अनेक मोहिमांमध्ये सीआरपीएफ ने प्रत्यक्ष सहभाग घेत हे सिद्ध केलं आहे की देशासाठी आणि समाजासाठी सीआरपीएफ सदैव तत्पर आहे.

आज जेव्हा राष्ट्रीय सुरक्षेचा विषय निघतो, तेव्हा अमित शहा यांचं नाव दृढ निश्चय आणि निर्णायक नेतृत्वाचे प्रतीक म्हणून पुढं येतं. मग ते जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद 370 हटवण्याचं ऐतिहासिक पाऊल असो, किंवा नक्षलवादावर निर्णायक प्रहार करणं असो—भारतीय राजकारणातील ‘चाणक्य’ अमित शहा यांनी पुन्हा पुन्हा सिद्ध केलं आहे की देशाच्या सुरक्षेसाठी कोणताही निर्णय घ्यायला ते कधीच मागेपुढे पाहत नाहीत.

मोदीजींच्या नेतृत्वात आणि अमित शहा यांच्या रणनीतींमुळे भारताने केवळ अंतर्गत सुरक्षाच बळकट केली नाही, तर त्या विचारसरणीलाही मागे ढकललं आहे जी अनेक वर्षांपासून आपल्या लोकशाहीला आव्हान देत होती. नक्षलवादाविरोधातील ही लढाई आता निर्णायक टप्प्यावर आली आहे, आणि या लढाईचे सेनापती म्हणून अमित शहा यांची भूमिका इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली जाईल. गृहमंत्रालयाच्या या ऐतिहासिक कार्यकाळाची भविष्यात जेव्हा कधी आठवण काढली जाईल, तेव्हा हे नक्की सांगितलं जाईल की मोदीजींच्या दूरदृष्टीने आणि राष्ट्रीय सुरक्षेचे ब्रँड अॅम्बेसेडर अमित शहा यांच्या निर्णयांनी एकत्रितपणे भारताला ती सुरक्षा दिली जी अनेक दशकांपासून देशवासियांना अपेक्षित होती.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राष्ट्रीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…