
no images were found
रामनवमीच्या पवित्र निमित्ताने झी टीव्ही कलाकार ह्या सणाच्या आपल्या काही सुंदर आठवणींना उजाळा देत आहेत!
रामनवमीचे हिंदु संस्कृतीमध्ये मोठे महत्त्व असून हा भगवान श्रीरामचंद्रांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये नवमी तिथीला रामाचा जन्म झाला होता. राम नवमीच्या आधीचे दिवस भक्तगण चैत्र नवरात्री म्हणून साजरे करतात. यात दुर्गा देवीच्या 9 वेगवेगळ्या अवतारांची पूजा केली जाते. चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी भक्तगण श्रीरामाचा जन्मदिवस साजरा करतात. रामनवमीच्या निमित्ताने झी टीव्हीवरील कलाकार ‘कुंडली भाग्य’मधील शक्ती आनंद, ‘कुमकुम भाग्य’मधील राची शर्मा, ‘इक कुडी पंजाब दी’मधील तनिषा मेहता आणि ‘प्यार का पहला नाम राधा मोहन’मधील नीहारिका रॉय यांनी ह्या सणाच्या आपला गोड आठवणी आणि ह्यावर्षी हा सण साजरा करण्याच्या त्यांच्या योजनांबद्दल सांगितले.
झी टीव्हीवरील ‘कुंडली भाग्य’मधील करण लुथ्राच्या भूमिकेतील शक्ती आनंद म्हणाला, “रामनवमीचे माझ्या आयुष्यात मोठे महत्त्व आहे. माझी पत्नी आणि मी सकाळच्या पूजेसह आमच्या दिवसाची सुरूवात करतो आणि नवरात्रीचे नऊ दिवस उपवास ठेवतो. रामनवमीच्या दिवशी आम्ही प्रार्थना करतो, भजने म्हणतो आणि प्रसाद वाटतो आणि रामजन्माचा आनंद साजरा करतो. अयोध्येमध्ये राम मंदिराची स्थापना ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असून त्यामुळे ह्यावर्षीचे सेलिब्रेशन आणखी खास बनले आहे. श्रद्धा आणि एकता यांचा संकेत म्हणून हे मंदिर उभे असून ह्यावर्षी अयोध्येला भेट देऊन राम मंदिराचे सौंदर्य न्याहाळण्यासाठी मी उत्सुक आहे. सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा.”
झी टीव्हीवरील ‘इक कुडी पंजाब दी’मधील हीरच्या भूमिकेतील तनिषा मेहता म्हणाली, “नवरात्री माझ्यासाठी खूप खास आहे. हा सण माझ्या आवडत्या सणांपैकी एक असून यात आनंद, श्रद्धा आणि परंपरांचा समावेश आहे. सगळे नऊ दिवस माझी आई उपवास करते आणि मंदिरात प्रार्थना करते, उपवासाच्या दिवसांमध्ये खाल्ले जाणारे पदार्थ बनवते. फिल्म सिटीमधील माझ्या सेटच्याच रस्त्यावर एक छोटेसे देऊळ आहे आणि दररोज सकाळी नक्की त्या देवळात जाते. दरवर्षी मी नवरात्रीच्या सुरूवातीची उत्कंठेने वाट पाहत असते. सकाळच्या आरतीपासून रामनवमीच्या निमित्ताने नवव्या दिवशी तयार करण्यात येणारे स्वादिष्ट पदार्थ यांचा स्वाद घेत असते. ह्या पवित्र निमित्ताने मी सर्वांना आनंदी रामनवमीच्या शुभेच्छा देते.”
झी टीव्हीवरील कुमकुम भाग्यमध्ये पूर्वीच्या भूमिकेतील राची शर्मा म्हणाली, “चैत्र नवरात्रीच्या सणाच्या आणि रामनवमीच्या माझ्या इंदौरच्या घरच्या खूप सुंदर आठवणी आहेत. आमच्या लहानपणी आम्ही आमच्या घराच्या जवळच्या मंदिरामध्ये हा सण उत्साहाने साजरा करायचो. नवरात्रीचे नऊ दिवस मी भगवान राम आणि मॉं दुर्गाचे मंदिरात जाऊन आशीर्वाद घ्यायचे. चैत्र नवरात्रीचा समारोप रामनवमीने होतो, हा दिवस खास आहे कारण हा भगवान रामाच जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो आणि ह्यादिवशी रामायणाचे पारायण केले जाते. ह्या दिवशी लोक उपवास ठेवतात आणि हनुमान आणि भगवान रामचंद्रांची पूजा करतात. माझ्या सर्व चाहत्यांना आणि प्रेक्षकांना आनंददायी नवरात्रीच्या आणि रामनवमीच्या मनापासून शुभेच्छा.”
झी टीव्हीवरील ‘प्यार का पहला नाम राधा मोहन’मधील राधाच्या भूमिकेतील नीहारिका रॉय म्हणाली, “चैत्र नवरात्री माझ्या आयुष्यात अतिशय महत्त्वपूर्ण आहे कारण मी दुर्गामातेची निस्सीम भक्त आहे. हे सगळे नऊ दिवस माझ्या मनामध्ये निव्वळ आनंद असतो. मी सकाळी लवकर उठते आणि माझ्या आईला पूजेसाठी मदत करते. सणासुदीच्या निमित्ताने तयार करण्यात येणारे पदार्थ आणि कुटुंबाच्या एकत्र येण्याची ऊब ह्या क्षणांची मी नवरात्रीच्या दिवसांमध्ये उत्साहाने प्रतीक्षा करत असते. नवव्या दिवशी रामनवमीसह, माझ्या घरचे आणि मी आमच्या घरी रामजन्माची एक छोटीशी पूजाही करतो. माझ्या आईने माझी ओळख ह्या सर्व परंपरांसोबत करून दिली आणि तेव्हापासून अतिशय श्रद्धेने मी ह्या परंपरा पाळत आहे. हे वर्ष माझ्यासाठी आणखी महत्त्वपूर्ण आहे कारण मला अयोध्या मंदिराला भेट देण्याची इच्छा आहे. त्याच्या सौंदर्याने माझ्या डोळ्यांचे पारणे फेडले असून लवकरच तो प्रवास करण्याची माझी इच्छा आहे. आनंददायी रामनवमीच्या सर्वांना खूप शुभेच्छा.”