Home क्राईम टीईटी घोटाळा याचिकाकर्त्यांना खंडपीठाचा दिलासा

टीईटी घोटाळा याचिकाकर्त्यांना खंडपीठाचा दिलासा

0 second read
0
0
251

no images were found

टीईटी घोटाळा याचिकाकर्त्यांना खंडपीठाचा दिलासा
औरंगाबाद : शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी घोटाळा प्रकरणी राज्य शासनानं अशा शिक्षकांचे वेतन थांबवण्याचं सरकारनं ठरवलं होतं, तसेच याची यादी देखील प्रसिद्ध केली होती. पण याविरोधात काही शिक्षकांनी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. या अनेक याचिकांवर आज खंडपीठात एकत्रित सुनावणी झाली.
यावेळी खंडपीठानं म्हटलं की, शिक्षकांचं वेतनं थांबवणं हा त्यांच्या कुटुंबियांवर अन्याय करणं आहे. त्याचबरोबर येत्या काळात दिवाळीचा सणवार असणार आहे. तसेच या घोटाळ्याबाबत शासनाकडून अद्याप स्पष्टता दिसत नाही, असं सांगत “या शिक्षकांची वेतनवाढ रोखू शकता पण वेतन थांबवू नका” असं कोर्टानं म्हटलं आहे. यानंतर आता शासकीय वकिलांनी युक्तीवादासाठी पुढची वेळ मागितली आहे. त्यामुळं शिक्षकांना हा अंतरिम दिलासा आहे.
हा दिलासा औरंगाबाद खंडपीठात ज्या दोनशे याचिका दाखल झाल्या आहेत. या याचिकाकर्त्या शिक्षकांनाच हा दिलासा देण्यात आला आहे. पण त्यांना यामुळं मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जलजीवन मिशन कोल्हापूर जिल्हयात शंभर टक्के यशस्वी होण्यासाठी उर्वरीत ६७ गावांना निधी द्यावा, खासदार धनंजय महाडिक यांचं केंद्रीय जलशक्ती मंत्री नामदार सी.आर.पाटील यांना निवेदन

  जलजीवन मिशन कोल्हापूर जिल्हयात शंभर टक्के यशस्वी होण्यासाठी उर्वरीत ६७ गावांना निधी…